Monday, September 7, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज शहरात ईद निमित्त काँग्रेस नेते रामदास मसराम यांच्या वतीने मिठाईचे वितरण...

देसाईगंज शहरात ईद निमित्त काँग्रेस नेते रामदास मसराम यांच्या वतीने मिठाईचे वितरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरात मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आज,सोमवार दिनांक-१६ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादुन्नबी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.ईद निमित्ताने मुस्लिम समाज बांधवांची देसाईगंज शहरातून रॅली काढण्यात आली. रॅली मध्ये लहानांपासून ते थोरांपर्यंत मुस्लिम समाज बांधव एकत्र येत गळाभेट घेऊन सर्वांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा देत होते.विविध समाज बांधवांच्या वतीनेही शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.अशातच ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त शहराच्या ब्रम्हपुरी रोड लगत असलेल्या जामा मस्जिद समोर ईद दिनाचे औचित्य साधून सर्व मुस्लिम समाज बांधवांना आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम यांच्या वतीने मिठाईचे वितरण करण्यात आले व पुष्पगुच्छ देत समाज बांधवांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा देऊन सामाजिक एकोपा जपण्यात आला.
यावेळी काँग्रेस नेते रामदास मसराम,मोरू मोहुर्ले, सागर वाढई,स्वप्नील मिसार,जावेद शेख,लंकेश ढोरे, गौरव शिलार,रेशीम प्रधान,दुषांत वाटगुरे,आकाश पेटकुले,रोशन कवासे,गोपाल दोनाडकर आदी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!