- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे.डोअर टू डोअर भेटी-गाठी,चालता-बोलता लक्ष असू द्या व नानाविध बोलबाला करून अनेकजण प्रचारात मग्न झाले आहेत.अश्यातच देसाईगंज नगर नारपिषद निवडणुक प्रचारात काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचे चित्र आहे.शहरातील जनतेत काँग्रेसबाबतचा कल जाणवतांना दिसून येतो आहे.काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क मोहीम, पदयात्रा व सभांद्वारे लोकांशी संवाद साधण्याचा जोरदार कार्यक्रम आखला आहे.पाणीटंचाई,रस्त्यांची दुरावस्था, घनकचरा व्यवस्थापनातील त्रुटी तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत अडचणी यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन देत काँग्रेसने प्रचारात गती आणली आहे.दुसरीकडे,स्थानिक नागरिकांनी प्रलंबित विकास कामांबाबत नाराजी व्यक्त केली असून बदलाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. “यावेळी बदल हवा” असा सूर शहरात उमटत असल्याचे प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यातून जाणवत आहे.आगामी काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता असून विविध पक्षांतील स्पर्धा चुरशीची होणार आहे.मात्र, प्रारंभीच्या टप्प्यात तरी काँग्रेस पक्ष प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.
- Advertisement -

