Tuesday, July 14, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज नगर परिषदेतील विजय हा कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा आणि जनतेच्या विश्वासाचा.. - भाजपा...

देसाईगंज नगर परिषदेतील विजय हा कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा आणि जनतेच्या विश्वासाचा.. – भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज गरपरिषदेत भारतीय जनता पक्षाला मिळालेला ऐतिहासिक विजय हा केवळ एका व्यक्तीचा नसून,तो भाजप कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम,शिस्तबद्ध संघटन आणि जनतेने पक्षावर दाखवलेले प्रेम,त्यामुळे हा विजय जनतेच्या विश्वासाचा विजय आहे,अशी भावना देसाईगंज भाजपा तालुका अध्यक्ष सुनील पारधी यांनी व्यक्त केली.
नुकताच रविवार २१ डिसेंबर रोजी देसाईगंज नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. देसाईगंज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या लता मुरलीधर सुंदरकर,तर भाजपाचे तब्बल १२ नगरसेवक निवडून आले.भाजपच्या लता सुंदरकर यांना ६ हजार ६४४ मते मिळाली,तर काँग्रेसच्या वनिता नाकतोडे यांना ६ हजार ०२८ मते मिळाली.केवळ ६१६ मतांच्या फरकाने सुंदरकर या विजयी झाल्या आहेत. विजयानंतर एका कार्यक्रमात संवाद साधतांना सुनील पारधी यांनी या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना आणि जनतेला दिले.ते म्हणाले की, माजी आमदार कृष्णा गजबे यांचे जनतेशी असलेले अतूट नाते आणि त्यांनी सर्वसामान्यांसाठी केलेले काम या विजयाचे मुख्य आधार ठरले आहे.भारतीय जनता पक्षाने नेहमीच शेतकरी, शेतमजूर,युवक, महिला आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे.आम्ही केलेल्या अविरत कार्याची पावती आज जनतेने मतपेटीतून दिली आहे.हा विजय केवळ जल्लोष करण्याचा नसून,आम्हाला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे.प्रसंगी देसाईगंज तालुक्यातील मतदारांचे असेच प्रेम आणि आशीर्वाद भविष्यातही पक्षावर राहतील,अशी आशा सुनील पारधी यांनी व्यक्त केली.नगर परिषदेतील विजयामुळे संपूर्ण तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!