Saturday, May 2, 2026
Homeभंडारादुर्दैवी घटना; अस्वलाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू..

दुर्दैवी घटना; अस्वलाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जंगल परिसरात गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर अचानकपणे हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना काल सोमवारी भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील वन विभागाच्या सानगडी(पूर्व) उपवन क्षेत्रातील पापडा बिटात घडली होती.अस्वलाच्या हल्ल्यात दौलत मणिराम राऊत वय ५५ वर्षे,रा.सोनका (पळसगाव),ता.साकोली,जि.भंडारा हे गंभीर जखमी झाल्याने प्रथमोपचारानंतर त्यांना नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दौलत राऊत हे गुरे चारण्यासाठी जंगल परिसरात गेले असता दुपारच्या सुमारास दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक हल्ला चढविला.परिसरात असलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत अस्वलाला हुसकावून लावले.घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन कटरे,वन क्षेत्र सहाय्यक गुरबेले,खंडागळे,वनरक्षक आशिष तूरकर, एस.एन.मेश्राम,गजभिये पथकासह घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करून घटनेचा आढावा घेऊन हल्ल्यातील जखमी दौलत राऊत यांना तात्काळ साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकलमध्ये हलविण्यात आले. मात्र,उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!