- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
पुणे :-दोन मुलींना घेऊन जात असलेल्या वडिलांच्या दुचाकीला एका हायवा ट्रकने धडक दिल्याने दुचाकी ट्रकच्या खाली येऊन चिमुकल्यांच्या वडिलांचा जागेवरच मृत्यू झाला,तर दोन मुलींचा रुग्णालयात नेत असतांना वातेच मृत्यू झाल्याची हृदयाला चटका लावणारी घटना आज,रविवार २७ जुलै रोजी पुणे जिल्ह्याच्या बारामती शहरात दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. अपघातात राजेंद्र आचार्य आणि त्यांच्या दोन मुली, सई वय ११ वर्षे आणि मधुरा वय ५ वर्षे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेने बारामती शहरात शोककळा पसरली आहे.
ओंकार आचार्य हे आपल्या दोन्ही मुलींसह एमएच ४२ बी ४८४४ क्रमांकाच्या दुचाकीवरून शहराच्या खंडोबानगर चौकातून जात होते.त्याचवेळी वेगाने येणाऱ्या एमएच १६ सी ए०२१२ क्रमांकाच्या एका हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेत तिघेही हायवा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्याने ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला,तर सई आणि मधुरा यांना तातडीने सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,उपचारापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पोलिसांनी हायवा ट्रक चालकाला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी दाखल होत एकच गर्दी केली.मृतदेहांचे हृदयद्रावक दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले.पोलिसांनी तातडीने कारवाई करत मृतदेह शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.घटनेने आचार्य कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
- Advertisement -

