उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या सुमारास रस्ते,बाजारपेठ तसेच गावखेड्यात शुकशुकाट पहावयास मिळतो आहे. अश्यातच आता हवामान खात्याने उन्हाच्या तडाख्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.उद्या,रविवार १९ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे,सातारा,सांगली आणि सोलापूरला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट, मराठवाड्यातील बीड,हिंगोली,नांदेड,लातूर, धाराशीवला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. त्याचबरोबर,२० एप्रिल ते २१ एप्रिल रोजी कोकण,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र,मराठवाडा व विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडेल.या विभागातील तब्बल २२ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.यावेळी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यानंतर मात्र २२ एप्रिल रोजी पावसाचे क्षेत्र कमी होणार आहे.दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला तसेच इतर पिकांचे संरक्षणासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

