पुणे :-जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकण गावाजवळील कडाचीवाडी येथील तळ्यात(गाव तलाव)पोहायला गेलेल्या चार शालेय विद्यार्थ्यांचा पोहतांना दमछाक होऊन बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार ३१ मे रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली.१.ओमकार बाबासाहेब हंगे वय १३ वर्षे,हल्ली रा.मार्तंडनगर,मेदनकरवाडी,मूळ रा.हंगेवाडी,ता.केज,जि.बीड.२.श्लोक जगदीश मानकर वय १३ वर्षे,हल्ली रा.मेदनकरवाडी,मूळ रा.धनवडी, ता.वरुड, जि.अमरावती.३.प्रसाद शंकर देशमुख वय १३ वर्षे,हल्ली रा.मेदनकरवाडी,मूळ रा.अंबुलगा,ता.मुखेड, जि.नांदेड.४.नैतिक गोपाल मोरे वय १३ वर्षे,हल्ली रा. मेदनकरवाडी,मूळ रा.बुलढाणा झरी बाजार,ता.अकोट, जि.अकोला,असे तळ्यात बुडून मृत्यु झालेल्या शालेय विद्यार्थ्यांची नावे आहेत.
वरील चारही शालेय विद्यार्थी आज शनिवारी मौज- मजा म्हणून सकाळच्या सुमारास साडे अकरा वाजेच्या दरम्यान घरून चाकण गावाजवळील कडाचीवाडी येथील तळ्यात पोहायला गेले होते.पोहण्यासाठी तळ्यात उतरले.पण तळ्यात पाणी जास्त असल्याने पोहतांना चौघांनाही दमछाक झाली.त्यामुळे बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत असतांनाच चौघांचाही बुडून मृत्यू झाला होता. लागलीच बराच वेळ होऊनही चौघेही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली.अशातच गाव तलावाच्या काठावर त्यांच्या चपला व कपडे आढळून आले.त्यानुसार स्थानिक नागरिकांसह आपदा मित्रांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यात बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढताच कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला.

