- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जंगलव्याप्त परिसरात चराईसाठी सोडलेल्या कळपातील एका आठ महिन्यांच्या गर्भार गायीवर दिवसाढवळ्या पट्टेदार वाघाने हल्ला चढवीत जागीच ठार केले असल्याची घटना लाखनी तालुक्यातील मांगली (बांध) शिवारात किटाडी बीट क्रमांक-२ येथे मंगळवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.यात पशुपालकाचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.पट्टेदार वाघाचा बंदोबस्त करून संरक्षण द्यावे;अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अमरपाल श्यामराव ठवरे रा.किटाडी असे नुकसानग्रस्त पशुपालक शेतकऱ्याचे नाव आहे. शेतीला जोडधंदा म्हणून ठवरे हे पशुपालन व्यवसाय करतात.त्यांनी किटाडी नजीकच्या मांगली (बांध) शिवारात असलेल्या आपल्या शेत शिवारालगतच्या जंगल परिसरात जनावरांचा कळप चराईसाठी मोकाट सोडला होता.जनावरे हिरवळीवर चरत असतांना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने कळपातील एका गायीवर हल्ला केला.त्यावेळी पशुपालक (शेतकरी) अमर ठवरे यांनी मोठ्या हिमतीने हातातील काठीने वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता,त्यांच्यावर वाघ चवताळला.ते घाबरून काही अंतरावर दूर पळून गेले.
घाबरलेल्या स्थितीत त्यांनी भ्रमणध्वनीवरून गावकऱ्यांना माहिती दिली.त्यावेळी मोठ्या संख्येने नागरिक धावून आले व आरडाओरड करून वाघाला जंगलात हुसकावून लावले.मात्र,तोपर्यंत गाय जागीच ठार झाली होती. घटनेची माहिती काल,बुधवारी वनविभागाला देण्यात आली.यानंतर पंचनामा करण्यात आला.
- Advertisement -

