Friday, April 17, 2026
Homeदेसाईगंज'तु माझ्याशी कां बोलत नाही'.! म्हणत अल्पवयीन प्रेयसीने हाताची नस कापली.. -देसाईगंज...

‘तु माझ्याशी कां बोलत नाही’.! म्हणत अल्पवयीन प्रेयसीने हाताची नस कापली.. -देसाईगंज तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-हल्ली अल्पवयीन मुला- मुलींचे प्रेम-प्रकरण सर्वत्र मोठ्या प्रमाणावर चांगलेच बहरून येऊ लागल्याच्या घटना सर्वत्र उघडकीस येत आहेत.अनेकजण प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणीत पळून जाणे,आत्महत्या करणे व नाना तऱ्हेचे प्रेमाच्या आणाभाका टाकून टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशातच एका अल्पवयीन मुलीने ‘तु माझ्याशी कां बोलत नाही’.! असे म्हणीत चक्क आपल्या डाव्या हाताची नस कापल्याची घटना काल,सोमवारी ३ मार्चला देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावात दुपारच्या सुमारास घडली असून आज,मंगळवारी उघडकीस आली.वेळेवर उपचार झाल्याने १४ वर्षीय तरुणी थोडक्यात बचावली आहे. मात्र,नस कापलेल्या हाताच्या जागेवर बारा टाके लागल्याची माहिती आहे.दोघेही प्रेमी हे अल्पवयीन तसेच शालेय शिक्षण घेत असल्याने पोलीस कारवाई टाळण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की,कोंढाळा गावातील
१४ वर्षीय तरुणी आणि १६ वर्षीय तरुणाचे बऱ्याच दिवसांपासून प्रेम बहरून येत आहे.प्रेमात रुसवे-फुगवे हे सुरूच असतात.सर्वकाही सुरळीत सुरू असतांना तरुणाने काही कारणास्तव प्रेयसीशी बोलणे बंद केले.
अशातच काल सोमवारी आपला प्रियकर कां बोलत नाही म्हणून तरुणीने प्रिकरास भेटण्याचा बेत आखला.भेटी दरम्यान ‘तु माझ्याशी कां बोलत नाही’.! ‘मी तुझ्यासाठी जीव देतो’ म्हणीत गावातील एका दुकानातून एक रुपयाचा ब्लेड घेऊन प्रियकरासमोरच डाव्या हाताची नस कापली.नस कापताच रक्तबंबाळ अवस्थेत तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.घडलेला प्रकार पाहून काहीकाळ रुग्णालयातील डॉक्टरांचीही तारांबळ उडाली. डॉक्टरांनी लगेच उपचार करून जखमेवर बारा टाके लावले.त्यातच एका सामाजिक कार्यकर्त्याने मध्यस्थी करीत सदर प्रकरण पोलिसांत जाऊ नये, याकरीता प्रयत्न केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!