Sunday, May 31, 2026
Homeचंद्रपूरजंगल परिसरात आग लावणाऱ्या तिघांवर वन गुन्हे दाखल..

जंगल परिसरात आग लावणाऱ्या तिघांवर वन गुन्हे दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड  उपवनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सिर्सी नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक-१५३४(संरक्षित वन) परिसरात मोहाफुले वेचण्याच्या उद्देशाने जंगल परिसरात आग लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच लोंढोली गावातील वनमाला मोरेश्वर घोंगडे वय ३८ वर्षे,उमेश नरेंद्र घोंगडे वय २५ वर्षे व भूपेंद्र नीलकंठ खोबे वय २५ वर्षे या तिघांविरुद्ध वनविभागाने गुन्हा नोंदवला आहे.सिर्सीचे वनरक्षक हे आपल्या प्राथमिक बचाव पथकासह (पीआरटी)नियमित जंगल परिसरात गस्तीवर असतांना शनिवार,२८ मार्च २०२६ रोजी तिघांनी जंगलात आग लावल्याचे निदर्शनास आले.आग लावून घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न करत असतांना वनकर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले.त्यानंतर, त्यांच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला.प्रकरणात भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम ३३(ड) अंतर्गत दोन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.तसेच आगीमुळे वन्यजीव व जैवविविधतेचे मोठे नुकसान झाल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९ व ३९ अंतर्गत तीन ते सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.सदरची कारवाई विभागीय वन अधिकारी राजन तलमले,सहाय्यक उपवनसंरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली  सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्र सहाय्यक मारुती पुल्लेवाड पुढील तपास करीत आहेत.कारवाईदरम्यान सिर्सीचे वनरक्षक महादेव मुंडे,गायडोंगरीचे वनरक्षक एकनाथ खुडे,उपरीचे वनरक्षक डांगे,नवेगावचे वनरक्षक सुषमा मेश्राम तथा पीआरटीच्या पथकानी सहकार्य केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!