Wednesday, July 15, 2026
Homeमुंबईचंद्रपूर जिल्ह्यात 'मत चोरी'; राहुल गांधींनी केला भांडाफोड..

चंद्रपूर जिल्ह्यात ‘मत चोरी’; राहुल गांधींनी केला भांडाफोड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा मतदारसंघात ६ हजार ८५० मतदार वाढवल्याचा दावा काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. मत चोरी ही कार्यकर्त्यांच्या हातून झाली नाही,तर यासाठी खास मॉडेल तयार करण्यात आले आणि कॉल सेंटरच्या माध्यमातून हा प्रकार राबवण्यात आला.या प्रकाराला स्वतः केंद्रीय निवडणूक आयोगाचे समर्थन मिळत असल्याचाही आरोप राहुल गांधी यांनी केला. ‘मत चोरी’ मागे एक मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला आहे.कर्नाटकातील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांतील उदाहरणे देतांना,त्यांनी महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघाचाही उल्लेख केला.राजुरा मतदारसंघ हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा भाग असून, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे.या मतदारसंघात एकूण ३ लाख १५ हजार ७३ नोंदणीकृत मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ लाख ५९ हजार ८२१ असून,१ लाख ५५ हजार २५२ महिला मतदार आहेत.तर ३४४ मतदान केंद्रे आहेत.राजुरा विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने भाजपचे देवराव विठोबा भोंगले यांना उमेदवारी दिली होती,तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे धोटे सुभाष रामचंद्रराव यांना निवडणुकीत उतरवले होते.या निवडणुकीत भाजपचे देवराव भोंगले यांनी काँग्रेसचे सुभाष धोटे यांचा ३ हजार ५४ मतांनी पराभव केला होता.देवराव भोंगले यांना ७२ हजार ८८२ मत मिळाली होती.तर सुभाष धोटे यांना ६९ हजार ८२८ मते मिळाली होती.काही महिन्यातच अनेक मतदार जोडल्या गेले.सायंकाळ होताच अचानकपणे मतदानात वाढ झाली.आम्ही पुराव्यानिशी ओरडुन सांगत आहोत की, ‘मत चोरी’ शंभर टक्के झालेली आहे,पण निवडणूक आयोग आमच्या प्रश्नाचे उत्तरच देत नाही. मतदार याद्या बरोबर की चूक हेही सांगत नाही.त्यामुळे ‘मत चोरी’ ही गंभीर समस्या असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.तसेच राजुरा मतदारसंघात ६ हजार ८५० मतदार वाढवल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. आरोपाचे खंडन होणे अपेक्षित आहे,अन्यथा लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!