Wednesday, September 2, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपूर जिल्हा वाघांच्या दहशतीत; आज वाघाने दोघांचा घेतला जीव..

चंद्रपूर जिल्हा वाघांच्या दहशतीत; आज वाघाने दोघांचा घेतला जीव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुके सध्या स्थितीत वाघांच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आजच्या  घटना पकडुन सतरा दिवसांत अकरा नागरिकांना जीव गमावला आहे.अश्यातच आज,मंगळवार २७ मे रोजी वाघाने दोघांचा जीव घेतल्याने वन्य प्राण्यांपेक्षा मानवी जीवन सस्ते झाल्याचे दिसून येत आहे.वाघाने एक महिला तर एका गुराखीला ठार केले आहे.महिला ही सरपण गोळा करण्यासाठी जंगल परिसरात गेली होती.तर इसम हा शेळ्या चराईसाठी जंगल परिसरात गेला होता.आज सकाळच्या सुमारास वाघाने मूल तालुक्याच्या चिरोली गावातील ४५ वर्षीय संजीवनी संजय मॅकलवार हिला ठार केले.तर दुसऱ्या घटनेत  दुपारच्या सुमारास वाघाने मूल तालुक्यातीलच कातांपेठ येथील रहिवासी असलेल्या ५० वर्षीय सुरेश मुंगरू सोपानकर याला ठार केले.
मूल तालुक्यातील चिरोली येथील महिला संजिवनी मॅकलवार ही कुटुंबीयांसह वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक-५२४ मधील भगवानपूर जंगल परिसरात आज सकाळी सरपण गोळा करण्यासाठी गेली होती. सरपण गोळा करत असतांनाच दबा धरून बसलेल्या वाघाने संजिवनीवर हल्ला चढविला.तितक्यातच
तिने आरडाओरड केल्याने काही अंतरावर असलेल्या  सहकारी व कुटुंबीयांना वाघाने हल्ला केल्याचे लक्षात आल्याने घटनास्थळी धाव घेत आरडाओरड केली. त्यामुळे वाघ जंगलाच्या दिशेने  पळून गेला.पण तो पर्यंत वाघाच्या हल्ल्यात संजिवनी ठार झाली होती.
सदर घटनेची माहिती गावात होताच नागरिक घटनास्थळी दाखल झाले.सदरची माहिती वनविभागाला देण्यात आली.त्यानुसार वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले.
दुसऱ्या घटनेत सुरेश सोपानकार हा शेळ्या,बकऱ्या चारण्यासाठी त्याच परिसरातील चिरोली गाव नजिक जंगल परिसरात गेला होता.दुपारी साडेबाराच्या सुमारास बकऱ्यांचा कळप घरी परतला,परंतु तो घरी परतला नसल्याने कुटूंबियांना व गावकऱ्यांना संशय आला. त्यानुसार वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाने चिरोली येथे जाऊन शेळ्या चारायला घेऊन गेलेल्या गावालगतच्या जंगल परिसरात शोध मोहिम राबवली.दरम्यान,काही अंतरावरच त्याचा मृतेदह वाघाने खाल्ल्याने छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.दोन्ही घटना जवळच असल्याने एकाच वाघाने दोघांनाही ठार केले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!