Wednesday, June 24, 2026
Homeदेसाईगंजघरकुलाचे स्वप्न पुर्ण करण्याकरिता किमान साडेतीन लाख रुपयांचा निधी द्या…!-रामदास मसराम यांची...

घरकुलाचे स्वप्न पुर्ण करण्याकरिता किमान साडेतीन लाख रुपयांचा निधी द्या…!-रामदास मसराम यांची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी…     

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- पंतप्रधान आवास योजने अंतर्गत नगर परिषद क्षेत्रातील घरकुल लाभार्थ्यांना २.५० लक्ष रुपये व ग्रामपंचायत क्षेत्रातील लाभार्थ्यांना १.५० लक्ष रुपये निधीची तरतुद असुन वाढत्या महागाईचा विचार केल्यास हा निधी अपुरा पडतो आहे.गोर-गरिब जनतेच्या घरकुलाचे स्वप्न पुर्ण करण्याकरिता किमान ३.५० लक्ष रुपयाच्या निधीची तरतुद करण्यात यावी; अशी मागणी शेतकरी नेते रामदास मसराम यांनी निवेदनाच्या माध्यमातुन मुख्यमंत्र्यांना केली आहे.                

महाराष्ट्र शासन व केन्द्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान आवास योजना,रमाई घरकुल,शबरी घरकुल व मागासवर्गीय घटक लाभ योजने अंतर्गत नागरी क्षेत्रातील नगर परिषद,नगर पंचायत क्षेत्रातील आर्थीक दृष्ट्या दुर्बल घटकांना २.५० लक्ष रुपयाची  तरतुद व ग्रामिण भागातिल दुर्बल घटकांना १.५० लक्ष रुपयाची तरतुद गेल्या १० ते १५ वर्षापुर्वी करण्यात आली होती.मात्र,दिवसेंदिवस वाढणारी महागाई व बांधकाम साहित्याचे वाढते दर लक्षात घेता हा निधी अतिशय अपुरा आहे.आजच्या महागाईच्या काळात विटा, सिमेंट,लोहा,रेती,गिट्टीचे दर गगणाला भिडले असुन बांधकामासाठी लागणारे रोजंदारीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.शासनाने निर्धारित केलेले नागरी क्षेत्रासाठी २.५० लक्ष व ग्रामिण क्षेत्रासाठी १.५० लक्ष असा भेदभाव योग्य नाही.कारण बांधकाम साहित्य व रोजंदारीचे दर सर्वांना सारखेच आहे.त्यामुुळे या तरतुदीत बदल करुन सर्वच क्षेत्रातील घरकुल लाभार्थ्यांना सरसकट ३.५० लक्ष रुपयाची तरतुद करण्यात यावी; अशी मागणी रामदास मसराम यांनी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदनाच्या माध्यमातुन केली आहे.

सदर निवेदन सादर करतेवेळी सागर वाढई,नितिन राऊत,जयश्री मेश्राम,दुष्यंत वाटगुरे,शोभा करंडे,मिरा मैन्द,रुपेश सुखदेवे,भुमेश्वर सिंगाडे,प्रमोद पत्रे,कमलेश बारस्कर,लीलाधर भर्रे,दिनेश आंबोने,हरिदास बगमारे,राहुल बोरकर,अशोक गातारे,मनोज पिलारे,शालीकराम पिलारे,जयंत भागडकर,सुधाकर कोडाप,ललित शेन्डे यांचेसह तालुक्यातील घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!