- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-हवामान खात्याकडून चंद्रपूर जिल्ह्यासह भंडारा जिल्ह्यास काल,शुक्रवार २५ जुलै रोजी पावसाचे “रेड अलर्ट” जाहीर करण्यात आले होते.त्यानुसार दोन्ही जिल्ह्यात सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.मात्र,काल शुक्रवारी पावसाने हजेरी न लावता आज शनिवारी भंडारा जिल्ह्यासह गडचिरोली,चंद्रपूर, नागपूर, गोंदिया व इतर जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे.अश्यातच आज पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आली असून भंडारा ते कारधा येथील वैनगंगेवरील लहान पूल,खमारी नाला,साकोली तालुक्यातील विर्शी ते उकारा, चिंगी ते खोबा,गिरोला ते बोंडे,सराटी ते चिचगाव, नेहारवाणी ते कटनधरा,लाखनी तालुक्यातील मिरेगाव ते सोनमाळा हे मार्ग बंद झाली आहेत.सध्या स्थितीत वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी इशारा पातळीच्या खाली असून पाणी पातळीत वाढ होऊन सततच्या पावसाने पूर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
- Advertisement -

