Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीपुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोघांचे सापडले मृतदेह..

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोघांचे सापडले मृतदेह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील सलंगटोला येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेले दोघेजण कोरचीला परत जात असतांना बेळगाव-पुराडा नाल्यावर दुचाकीसह पुराच्या पाण्यात बुधवार २३ जुलै रोजी वाहून गेले होते.पुराच्या पाण्यात वाहून जात असतांना काही नागरिकांनी प्रत्यक्ष बघितले होते.त्यानुसार याबाबत बेळगाव पोलिसांना माहिती देण्यात आली.बेळगाव पोलिसांनी २४ जुलै रोजी शोधमोहीम राबवली असता दुचाकी आढळून आली. मात्र,दोघे आढळून आले नसल्याने परत शोधमोहीम राबविण्यात आली.अखेर आज,शनिवार २६ जुलै रोजी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोघांचेही मृतदेह सापडले.तलवारशहा मडावी वय ४५ वर्षे व देवसाय मडावी वय ६० वर्षे अशी पुराच्या पाण्यात वाहून मृत पावलेल्या मृतकांची नावे असून दोघेही कोरची तालुक्याच्या सोनपूर येथील रहिवासी होते.पुढील तपास बेळगाव पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!