- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-गावचा गावगाडा हाकणाऱ्या राखीव जागांवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील एका विद्यमान सरपंचासह तब्बल ५६ सदस्य अपात्र ठरल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी नुकताच जारी केला आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील काही निवडक ग्रामपंचायतमध्ये जानेवारी २०२१,ऑक्टोंबर २०२२,तसेच डिसेंबर २०२२ मध्ये सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका घेण्यात आल्या होत्या.अनु,जाती जमाती,नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्याकरिता राखीव असलेल्या जागेसाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र व विनियमन अधिनियम २००० (२००१ च्या महा.२३) च्या तरतुदींना अनुसरून सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. निवडून आलेल्या उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची बाब शासनाच्या लक्षात आल्याने मुदतवाढ देण्याचा विचार करण्यात आला होता.
विहीत मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना ७ ऑक्टोंबर २०२४ व २७ जानेवारी २०२५ अशा प्रकारे दोनदा त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी पुरेशी संधी देण्यात आली होती.मात्र,दोनदा दिलेल्या संधीचे सोने करण्यात तब्बल ५६ सदस्य अपयशी ठरल्याने व विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने सर्वांवर अपात्रतेची टांगती तलवार ओढवून अपात्र ठरविण्यात आले आहे.
- Advertisement -

