उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- शासनस्तरावरून शेतकऱ्यांच्या धानाला योग्य हमीभाव मिळावा; यासाठी आधारभूत धान्य खरेदी केंद्रांच्या माध्यमातून धान खरेदी केला जातो.सध्याच्या घडीला देसाईगंज तालुक्यातील रब्बी उन्हाळी धान पिकाची मोठ्या प्रमाणात कापणी व मळणी जोमात सुरू झाली आहे.मात्र शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न केल्याने मळणी केलेले धान पीक धान्य खरेदी केंद्रा अभावी खाजगी व्यापाऱ्यांना कमी भावात विक्री करावी लागत आहे.त्यामुळे शासनाने देसाईगंज तालुक्यातील लवकरात-लवकर उन्हाळी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रे सुरू करावे; अशी मागणी ओबीसी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी केली आहे.
तालुका परिसरात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान उत्पादक शेतकरी वर्ग आहे.शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे तसेच महागाईमुळे शेतकऱ्यांना शेती करणे न परवडणारे झाले आहे.लागत खर्च जास्त तर उत्पादन कमी होत असल्याने कर्जाचे डोंगर उभे येऊन ठाकले आहे.अशातच सततची नापिकी,किडीचा प्रादुर्भाव,अवकाळी पाऊस तसेच इतर समस्या शेतकऱ्यांना नेहमी भेडसावत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.हल्ली धान कापणीला वेग आला असून मळणी सुरू झाली आहे.मळणी नंतर अनेक शेतकऱ्यांकडे धान्य साठवणुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कमी भावात नेहमीच खाजगी व्यापाऱ्यांना धान्य विक्री करावी लागत असते.त्यामुळे नेहमी शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळेच शेतकरी आत्महत्या व इतर प्रकरणे उत्कर्षाणे सामोरे येऊ लागले आहेत.अशी प्रकणे थांबणे गरजेचे आहे.याकडे शासनाने जातीने लक्ष घालून खाजगी व्यापाऱ्यांना कमी दरात शेतकऱ्यांनी धान्य विक्री करण्यापूर्वी; देसाईगंज तालुक्यातील उन्हाळी धान्य खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करण्यात यावी; अशीही मागणी ढोरे यांनी शासनाकडे केली आहे.

