- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-खरीप हंगामातील रोवणीची कामे आटोपलेली आहेत.रोवणी नंतर धान पीकाच्या वाढीकरीता युरीया खताची गरज असते.मात्र,ऐन गरजेच्या वेळेस शहरातील दुकानातून यूरीया खत गायब झाल्याने युरीया खताकरीता शेतकऱ्यांची भटकंती सुरू आहे.त्यामुळे कृषी विभागाने तातडीने नियोजन करीत बाजारात युरीया खताची उपलब्धता सुनिच्छीत करावी, अशी मागणी भाजपा जिल्हामहामंत्री तथा माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे यांनी केली आहे.
कुरखेडा तालुक्यातील कृषी केंन्द्रात सद्या कुणाकडेही युरीया खत उपलब्ध नाही.त्यामुळे शेतकरी हैराण झालेले आहेत.रोवणी नंतर धान पीकाला युरीया खत उपलब्ध न झाल्यास पीकाची वाढ खुंटते.उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असते.त्यामुळे तातडीने तालुक्याकरीता युरीया खताचा पुरवठा सुनिच्छीत करण्यात यावा. अनेकदा ज्यावेळी ज्या खताची उपलब्धता कमी व मागणी अधिक असते.अश्यावेळी काही विक्रेते अधिक नफा कमावण्याच्या हव्यासापोटी काळाबाजार करीत शासनाच्या सुनिच्छीत करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारत शेतकऱ्यांची लूट करतात. मात्र,यावेळी अडलेला शेतकरी तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाही.त्यामुळे कृषी विभागाच्या भरारी पथकाने तक्रारीची वाट न बघता प्रमुख विक्रेत्यांवर नजर ठेवत दुकानाच्या दर्शनीय भागात स्टाॅक व दर फलक लावण्यात आलेला आहे की नाही,याची खबरदारी घ्यावी,दुकान व गोदामाची नियमित तपासणी करावी, तसेच आणीबाणीच्या प्रसंगी खाजगी विक्रेत्यांच्या तुलनेत सहकारी संस्था मार्फत उपलब्ध करून देण्यात येणारा रासायनिक खत शाशकीय दरात मिळण्याची अधिक शाश्वती राहत असल्याने अधिकाधिक खत हा सहकारी संस्था मार्फतच शेतकऱ्यांना उपलब्ध होईल, असे नियोजन करावे,अशीही मागणी भाजपा जिल्हामहामंत्री तथा कुरखेडाचे माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे यांनी केली आहे.
- Advertisement -

