Wednesday, April 15, 2026
Homeदेसाईगंजउद्याला देसाईगंज दीक्षाभूमी येथे रमाई उत्सवानिमित्त समाज प्रबोधन तथा नाट्य प्रयोगाचे आयोजन..

उद्याला देसाईगंज दीक्षाभूमी येथे रमाई उत्सवानिमित्त समाज प्रबोधन तथा नाट्य प्रयोगाचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहर बौद्ध समाज कोअर कमीटीच्या वतीने उद्या रविवार दिनांक-९ फेब्रुवारीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्श देसाईगंज दीक्षाभूमीवर रमाई उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.रमाई उत्सवाचे औचित्य साधून कमिटीच्या वतीने दुपारी १ वाजे समाज प्रबोधन तर रात्रो ७ वाजेच्या सुमारास ‘रमाई झाली महान’ नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर होऊ घातलेल्या समाज प्रबोधन समारंभाच्या अध्यक्षस्थानी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम तर उदघाटक आमदार तथा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले असणार आहेत.तसेच कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अभिलाषा गावतुरे व पत्रकार,कवी तथा लेखक अविनाश टिपले हे मुख्य मार्गदर्शन करणार आहेत.रात्री ७ वाजताच्या सुमारास कवीवर्य भिमानंद मेश्राम लिखित व दिग्दर्शित डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सहचरिणी त्यागमुर्ती रमाई यांच्या जिवनावर आधारित ‘रमाई झाली महान’ या नाटकाचे प्रयोग मोफत दाखविण्यात येणार आहे.त्यामुळे
समाज प्रबोधन तथा नाट्य प्रयोगाचा लाभ समस्त जनतेंनी घ्यावा; असे आवाहन देसाईगंज शहर बौद्ध समाज कोअर कमेटीचे अध्यक्ष प्रकाश सांगोळे,प्रवक्ते विजय बन्सोड,सचिव हंसराज लांडगे,कार्याध्यक्ष भिमराव नगराळे,उपाध्यक्ष साजन मेश्राम,सुरज ठवरे सह सुनील सहारे आदिंनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!