Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरआदिवासी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; २६७ विद्यार्थ्यांना त्रास..! - ९ विद्यार्थ्यांची...

आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; २६७ विद्यार्थ्यांना त्रास..! – ९ विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जांभुळघाट येथील आदिवासी शासकीय आश्रम शाळेतील तब्बल २६७ विद्यार्थ्यांची प्रकृती अचानकपणे खालावून मळमळ,उलट्या,पोटदुखी, खाज,अंगावर सुज व चक्कर येण्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.यातील ९ विद्यार्थ्यांची प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना चिमुर उपजिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.जांभुळघाट येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळा ही चिमूर तालुक्याच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत चालवल्या जाते.येथे एकूण ५३८ विद्यार्थी मुले-मुली शिक्षण घेत आहेत.सोमवार ११ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली.यात मळमळ उलट्या,पोटदुखी,खाज,अंगावर सुज व चक्कर येण्याचा प्रकार सुरू झाल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.यात तब्बल २६७ विद्यार्थी बाधीत झाले.तर ९ विद्यार्थ्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले.यात वेदीका चौधरी (वर्ग ४),राजेश नानाजी राजनहिरे(वर्ग ७),ऋतुजा आशीष चौधरी (वर्ग १०),चांदणी इंदरशहा सिडाम (वर्ग ९),स्नेहा नरेंद्र गायकवाड (वर्ग ७),मोनाली अनिल धुर्वे (वर्ग ७), सरवरी केशव दोडके(वर्ग १०),शिवाणी अंकोष चौधरी (वर्ग ८),अंजली उमेश फरंदे (वर्ग ४) आदी नऊ विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.अश्यातच आदिवासी संघर्ष समितीने विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा आरोप केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!