Saturday, May 2, 2026
Homeदेसाईगंजआता वय झाली भावा करायचे काय? मुलगी म्हणते नोकरीवाला; शेतीत राबायचे की...

आता वय झाली भावा करायचे काय? मुलगी म्हणते नोकरीवाला; शेतीत राबायचे की नाय?….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- दिवसेंदिवस वय वाढत चालली,किती मुली बघितल्या; परंतु एकही पसंत करीत नाही.अशी अनेक युवकांकडून आपबिती सांगितली जाते आहे.अशातच मुलींचीही डिमांड वाढली असल्याने काय करावे? तरुणांना सुचेनासे आहे.सुशिक्षित बेरोजगारांची संख्या शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही वाढत चालली आहे.ग्रामीण भागातील मुलीही आता शासकीय नोकरी वाल्यांना पसंती देत आहेत.काही भागात तर सुशिक्षित मुले वय होवूनही अविवाहीत आहेत.शासकीय नोकरी नसल्याने पत्ताच कट केला जात आहे.शेती असून शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळणे कठीण जात आहे.

मुलीचीच नव्हे तर वधूपित्याची पहिली पसंती शासकीय नोकरीतील मुलांनाच अधिक आहे.त्या खालोखाल खाजगी नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या मुलांना अधिक पसंती दिली जाते.मात्र शेतकरी आणि ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना मात्र मुलगी मिळणे आधुनिक युगात कठीण झाले आहे.काही तरूण बिना हुंड्याने विवाह करायला तयार आहेत.परंतू वधूपिता मुलगी द्यायला तयार नाही.पूर्वीच्या काळात हुंडा व मुलगी अनेकांना मिळत होती.परंतू आधुनिक काळात त्यात बदल झाला आहे. त्यामुळेच वधूपिता आपली मुलगी सुखाने राहावी, यासाठी शासकीय नोकरीवर असलेला जावई शोधत आहेत.गावागावातच आता वरासाठी वधू शोधन्याचे काम सुरू आहे.परंतू जो-तो वधूपिता शासकीय नोकरी असणाऱ्यांनाच प्राधान्य देत आहे. शेतकऱ्याच्या मुलाचा भाव लग्नाच्या बाजारात घसरलेला आहे.चार ते दहा एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी मिळणे कठीण जात आहे. एव्हढेच नव्हे तर मामा सुद्धा शेतकरी असलेल्या भाच्याला मुलगी देणे नापसंत करीत आहेत.त्यामुळे लग्नाळू मुलांना मुली मिळणे कठीण जात आहे.त्यामुळे शेतीत राबायचे की नाही? असा प्रश्न अनेक युवकांना पडलेला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!