- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-निवडणूक म्हटले की, दारू, पार्ट्या व पैशांचा महापूर राहतो.त्याच्या पूर्ततेसाठी परवाना प्राप्त दारूऐवजी गावठी,हातभट्टीच्या दारूवर अधिक भर दिला जातो.येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात,गावखेड्यात,दुर्गम भागात गावठी दारूच्या भट्ट्या पेटल्या आहेत.मात्र,देसाईगंज तालुक्यातील या भट्ट्या विझविण्याचे आव्हान देसाईगंज पोलिस विभागापुढे आहे.
सद्यःस्थितीत सर्वच नदी-नाल्यांना पाणी आहे.याच नदी-नाल्यांच्या काठावर व आश्रयाने मोहफुल हातभट्टीच्या दारूच्या भट्टया पेटल्या आहेत.खास निवडणुकीत मतदारांना,कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी ही दारू काढली जात असून,चोरट्या मार्गाने त्याचा पुरवठा होणार आहे.दाट जंगलाचा आश्रय घेऊन या भट्टया पेटविल्या गेल्याने सहसा कोणाच्या दृष्टीस पडत नाही.जंगलातील या दारूभट्टया शोधण्याचे व त्या नष्ट करण्याचे आव्हान देसाईगंज पोलीस विभागापुढे आहे.
- Advertisement -

