- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-ऐन मकरसंक्रांती सणाच्या दिवशीच एका १६ वर्षीय मुलाचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात उघडकीस आली आहे.आज,बुधवार १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांती निमित्त तुमसर तालुक्याच्या तामसवाडी गावालगतच्या वैनगंगा नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या तीन मुलांपैकी एका मुलाचा बुडून मृत्यू झाला,तर दोघेजण थोडक्यात बचावले.सदरची घटना दुपारच्या सुमारास घडली.क्षितिज लीलाधर लांजेवार वय १६ वर्षे,रा.तामसवाडी,ता.तुमसर, जि.भंडारा असे मृताचे नाव असून तो डोंगरला येथील पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यालयाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी होता.तामसवाडी येथील क्षितीज लांजेवार, आर्यन श्रीराम ठाकरे आणि रुद्र पिंटू अमृते हे तिघे मित्र आज बुधवारी मकरसंक्रांतीनिमित्त गावालगतच्या वैनगंगा नदीपात्रात आंघोळीसाठी गेले होते.तिघेही नदीपात्रात उतरले.मात्र,पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही खोल पाण्यात गेले.तिघेही पाण्यात बुडत असतांनाच बाजूलाच उपस्थित असलेल्या तरुणाने आर्यन व रुद्र या दोघांना वाचवले.मात्र,क्षितिजला वाचविण्यात यश आले नाही.यात त्याचा मृत्यू झाला. लागलीच पोलिस आणि गावकऱ्यांच्या मदतीने क्षितिजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.ऐन सणाच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
- Advertisement -

