Wednesday, September 9, 2026
Homeभंडाराअवैध रेती तस्करीवर रामबाण उपाय; आता पलीकडच्या जिल्ह्यातही उभारणार चेक पोस्ट..

अवैध रेती तस्करीवर रामबाण उपाय; आता पलीकडच्या जिल्ह्यातही उभारणार चेक पोस्ट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-गडचिरोली जिल्ह्यात अवैध गौण खनिजाच्या उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान,पर्यावरणाची हानी आणि गुन्हेगारी वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यावर आळा घालण्यासाठी गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी ३१ जानेवारी २०२५ रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी स्थायी चेकपोस्ट कार्यान्वित करून अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घातला होता.अश्याच प्रकारे भंडारा जिल्ह्यात अवैध रेती तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.पोलिस यंत्रणा आणि महसूल विभागाचे पथक रोज कारवाया करतांना दिसून येत आहेत.तरीही तस्करी थांबलेली नाही.नुकतेच काही दिवसांपूर्वी भंडारा उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांच्या वाहनाच्या अपघाताच्या घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर येत जिल्हा महसूल विभागाने अवैध रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तब्बल २१ चेकपोस्ट कार्यान्वित करणार असून संपूर्ण चेकपोस्ट सीसीटीव्हीने जोडलेले असतील.त्याचे मॉनिटरिंग २४ तास जिल्हाधिकारी कार्यालयातून केले जाणार आहे. या सर्व पॉइंटवर दोन पोलिस कर्मचारी आणि महसूल विभागातील एक अधिकारी असे तिघांचे पथक असेल.२४ तास ही चौकी कार्यरत राहणार आहे. जिल्ह्यातील ज्या घाटांवरून रेतीची तस्करी होते,त्या घाटांवर बंदोबस्त लावणे अथवा मनुष्यबळ तैनात करणे शक्य नाही.रेती तस्कर संघटितपणे गुन्हा घडवितात. एवढेच नाही तर,आडमार्गाने रेतीची वाहतूक करतात. अशावेळी घाटांवर मनुष्यबळ गुंतविण्याऐवजी ज्या मार्गाने रेती जिल्ह्याबाहेर नेली जाते,त्या मार्गावरच हे चेकपोस्ट उभारले जाणार आहेत.त्यामुळे तस्करांची नाकाबंदी करणे सोईचे होईल,असा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे.या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आणि महसुलाची होणारी लुट थांबविण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही सहकार्य करावे,असे आवाहन केले जात आहे.या मोहिमेसाठी जिल्हा खनिकर्म विभागाकडून निधीची उपलब्धता केली जाणार आहे.२१ ठिकाणी उभारले जाणारे चेक पोस्ट,सीसीटीव्ही यासह अन्य खर्चाच्या तरतुदीसाठी ही व्यवस्था केली जाणार आहे.
सावन कुमार,जिल्हाधिकारी भंडारा👇
रेती तस्करी थांबविण्यासाठी अधिकाधिक घाटांचा लिलाव या वर्षी करण्याचे नियोजन असून  महसूल विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे.यामुळे रेती तस्करी कमी होऊन जिल्ह्याच्या महसुलातही भर पडेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!