Wednesday, July 15, 2026
Homeकुरखेडाअपघात विमा खचलेल्या कुटुंबीयांना जगण्याचे बळ देते- चांगदेव फाये - मृतक...

अपघात विमा खचलेल्या कुटुंबीयांना जगण्याचे बळ देते- चांगदेव फाये – मृतक मनिष लोहबंरे यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांच्या अपघात विम्याचे धनादेश वितरीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-अपघात ही अप्रिय व कटू घटना असली तरी अनेकांना नकळत मोठा आघात सहन करावा लागतो.अनेक कुटुंबे अपघातामूळे उध्वस्त होतात.घरातील कर्ता व्यक्ती गमावल्याने अनेकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. अशावेळी अपघात विमा हा जिवन परत मिळवून देऊ शकत नसला,तरी उध्वस्त,खचलेल्या कुटुंबीयांना जगण्याचे बळ मात्र निश्चितच देते.त्यामुळे सगळ्यांनी शाशन पूरस्कृत अपघात विमा योजनेचा लाभ घ्यावा; असे आवाहन कुरखेडा भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांनी केले आहे.
मागील दोन महिण्यापूर्वी कुरखेडा-वाकडी मार्गावर मनिष यादवराव लोहबंरे वय २५ वर्षे या यूवकाचा रस्ता अपघातात मृत्यु झाला होता.घरातील कर्ता व्यक्ती गमावल्याने लोहबंरे कुटुंबियांवर मोठा आघात झाला होता.मृतकाने केंद्र शासन पुरस्कृत भारतीय पोस्ट विभागाचे वार्षिक ३९९ रूपयाचे अपघात विमा पालीसी घेतली होती.पोस्ट विभागाद्वारे त्यांचा अपघात विमा दावा मंजूर करण्यात आला व त्यांच्या कुटुंबीयांना कुरखेडा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात १० लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी भारतीय पोस्ट विभागाचे विभागीय व्यवस्थापक कैलाश काकडे,कुरखेडा शाखा व्यवस्थापक अभय किरकटे,कर्मचारी उमेश धमगाये,रमन राज,वैभव भावसार,नारायण आदमपुरे,अमोल पवार,लोकेश हटवार,मृतकाचा भाऊ छगन लोहबंरे तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे,शहराध्यक्ष सागर निरंकारी,तालुका महामंत्री प्रा.विनोद नागपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!