आरमोरी(गडचिरोली):-सोनपूर येथील पेसा समिती व गावकऱ्यांच्या वतीने गेल्या सात-आठ महिन्यांपासून सतत ग्रामपंचायत प्रशासन व वरिष्ठ कार्यालयांना सोनपूर येथील आबादी जागेवरील अतिक्रमण हटविणे व अन्य काही मुद्यांना घेऊन निवेदने देत मागण्यांची पूर्तता करण्यासाठी विनंती करण्यात आली होती. सदरच्या मागण्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्याने मागण्यांवर ग्रामपंचायत प्रशासनाने तोडगा काढावा म्हणून पेसा समिती पदाधिकारी व सोनपूर येथील गावकरी हे आक्रमक झाले होते.त्यांनी ६ जून २०२४ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केले.या आंदोलनादरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी हमीपत्र देऊन मागण्या पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु,चार महिण्यांचा कालावधी लोटूनही एकही मागणी पूर्ण झाली नाही.त्यामुळे २० सप्टेंबर २०२४ पासून पुन्हा कोजबी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत साखळी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.सदरच्या आंदोलनाला आठ दिवसांचा कालावधी लोटूनही ग्रामपंचायत प्रशासनाने दखल न घेतल्याने शेवटी आंदोलनकर्ते संतप्त झाले आहेत.यातूनच त्यांनी सरपंच,ग्रामसेविका व उपसरपंचाच्या खुर्च्याना चपला,जोड्यांचा हार घालून निषेध व्यक्त केला.
अन् संतप्त आंदोलनकर्त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामसेविकेच्या खुर्चीला घातला हार.. -आरमोरी तालुक्यातील घटना…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

