Wednesday, August 5, 2026
Homeनागपूरअखेर नागपुरातील दंगल प्रकरणी आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल...

अखेर नागपुरातील दंगल प्रकरणी आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महाल गांधीगेट परिसरात औरंगजेबाच्या कबरीचे दहन केले होते.या घटनेनंतर,मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे शहराध्यक्ष फहीम खान शमीम खान यांनी काही युवकांनी ‘आयत’ असलेली चादर जाळल्याचे सांगून हे धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे म्हटले.यानंतर,फहीम खान यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात निवेदन देऊन चादर जाळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.पोलिसांनी त्यांना आश्वासन देऊन परत पाठवले.मात्र,त्यानंतर गांधीगेट परिसरातून फहीम खान यांच्या नेतृत्वाखाली काही युवक जात असतांना त्यांनी घोषणाबाजी केली, ज्यामुळे वाद निर्माण झाला आणि दंगल उसळली.
नागपूर दंगलीप्रकरणी मुख्य आरोपी फहीम खान आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नागपूर सायबर पोलिसांनी याप्रकरणी ५० हून अधिक आरोपींवर कठोर कारवाई करत गंभीर कलमे लावली आहेत.काही व्हिडिओ आणि मॅसेज परदेशी आयपी अ‍ॅड्रेसवरून व्हायरल करण्यात आल्याचे उघड झाले आहे.या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चौकशी करत अनेक संशयितांवर लक्ष केंद्रित केले आणि यामागे मास्टरमाइंड म्हणून फहीम खानचे नाव समोर आले.नागपूर सायबर पोलिसांनी या संपूर्ण कटाचा तपास सुरू केला असून, आरोपींनी वापरलेले मोबाईल आणि अन्य डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!