- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील शैक्षणीक गुणवत्ता सुधारावी तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील सातत्य आणि शैक्षणिक उत्कृष्टता राहावी,यासाठी राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना लवकरच सीबीएसई (CBSE-Central board of secondary Education-केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे.महाराष्ट्र बोर्डाच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याबाबतच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे.येत्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासूनच सीबीएससी अभ्यासक्रम लागू करण्यात येणार असल्याची शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी विधान परीषदेत यासंदर्भात माहिती दिली.विधान परीषदेत विचारलेल्या प्रश्नाला मंत्री दादा भूसे यांनी लेखी उत्तर दिले.भाजप आमदार प्रसाद लाड यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली का?असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विचारला होता.सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.१ एप्रिलपासून सत्राची सुरुवात करण्यात येणार,असल्याची माहिती देण्यात आली.शाळांचे वर्षभराचे वेळापत्रक यंदा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये शिक्षण विभागाकडून अचानक पहिल्या इयत्तेपासून नवव्या इयत्तेपर्यंतची वार्षिक परीक्षा एप्रिलअखेरीस घेण्याची सूचना जारी केली.मात्र या सुचनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच धांदल उडाली आहे.या परीक्षा पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच व्हाव्यात,अशी शिक्षकांसह पालकांची मागणी आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) हे भारतातील एक राष्ट्रीय शिक्षण मंडळ आहे जे संलग्न शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि मानके निश्चित करण्यासाठी जबाबदार आहे.CBSE चे उद्दिष्ट देशभरात एकसमान शिक्षण प्रणाली प्रदान करणे आहे,ज्यामुळे अध्यापन आणि शिक्षणात सातत्य आणि गुणवत्ता सुनिश्चित होते.त्याचे ध्येय संरचित अभ्यासक्रम आणि नियमित मूल्यांकनाद्वारे शैक्षणिक उत्कृष्टता आणि समग्र विकासाला प्रोत्साहन देणे आहे.
- Advertisement -

