- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-उकाड्यामुळे जीवाची लाहीलाही होत असतांना अनेकांनी थंड हवेसाठी कुलर सुरू केले आहेत.कुलरच्या हवेने काहीकाळ कां असेना थंडावा मिळतो.अशातच कुलर सुरू करतांना काळजी घेणे आवश्यक असते.त्यातील पाण्यामुळे विजेचा शॉक लागून एखादेवेळी जीव गमावावा लागतो.असाच प्रकार गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील खरकाडा येथे काल,सोमवारी ३१ मार्च रोजी उघडकीस आला आहे.घरातील कुलर सुरू करायला गेलेल्या एका २८ वर्षीय विवाहित तरुणाचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला आहे.लहू मनोहर आत्राम असे विजेचा शॉक लागून मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
माहितीनुसार,लहू आत्राम हा काल,सोमवारी ३१ मार्च ही राशनकार्डची ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख असल्याने नागपूरहून आपल्या स्वगावी खरकाडा येथे आला होता.उन्हातून आल्यावर त्याने दुपारी ४ च्या सुमारास घरातील कुलर सुरू करण्याचा प्रयत्न केला.अशातच कुलरमध्ये करंट आल्याने बटन दाबताच त्याला जोरदार शॉक लागला.तितक्यातच घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेत तात्काळ लहू याला गावाहून कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.विजेचा शॉक इतका जोरदार होता की, रुग्णालयात दाखल करताच तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.लहू हा विवाहित असून त्याच्या पश्चात आई-वडील,पत्नी व दीड वर्षाचा मुलगा आहे.तो नागपूर येथील एका खासगी कंपनीत कामावर होता.एका चुकीने होत्याचे नव्हते झाले.त्याच्या मृत्यूने परिवारात शोककळा पसरली असून पत्नीने घटनास्थळी एकच टाहो फोडला.
- Advertisement -