भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील रेंगेपार/कोठा येथील शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याची हत्या करणाऱ्या आरोपीस भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.राजेंद्र निंबार्ते वय ४० वर्षे,रा.रेंगेपार/कोठा,लाखनी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.तर सुधाकर बालकृष्ण निंबार्ते वय ४३ वर्षे,रा. खोकरला,ता.जि.भंडारा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.सदरची घटना २८ जुलै २०१७ रोजी लाखनी तालुक्यातील रेंगेपार/कोठा येथे घडली होती.२८ जुलै २०१७ रोजी राजेंद्र निंबार्ते हे शेतात रोपाईसाठी ट्रॅक्टर घेऊन जात असतांना आरोपी निंबार्तेने त्यांना अडवून वाद घातला.वाद वाढल्यानंतर आरोपीने त्यांच्यावर चाकूने वार केला.वडिलांवर हल्ला होतांना पाहून मुलगा राकेश निंबार्ते वाचवण्यासाठी धावून गेला असता आरोपीने त्याच्यावरही चाकूने हल्ला केला.गंभीर जखमी झाल्याने निंबार्ते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या घटनेबाबत मृतकाची पत्नी रजनी राजेंद्र निंबार्ते वय ३५ वर्षे,रा.रेंगेपार/कोठा,ता.लाखनी यांच्या तक्रारीवरून लाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तत्कालीन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी तपास करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.प्रकरणाची सुनावणी पार पडली.यात घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. प्रकरणी भंडारा जिल्हा व सत्र न्यायाधीश-२ तसेच अतिरिक्त सत्र न्यायाधीश भारती काले यांनी आरोपी सुधाकर निंबार्ते यास काल मंगळवारी आजन्म कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला.या प्रकरणात सरकारी ॲड.दुर्गा तलमले यांनी प्रभावीपणे काम पाहिले.
शेतीच्या वादातून शेतकऱ्याची हत्या करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावास..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

