Saturday, March 15, 2025
Homeगोंदियाशेतकरी गेला आपबिती सांगायला अन भलतेच सांगितले साहेबाने...! ईटीयाडोह...
spot_img

शेतकरी गेला आपबिती सांगायला अन भलतेच सांगितले साहेबाने…! ईटीयाडोह पाटबंधारे विभागातील प्रकरण….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया:- आमगाव तालुक्यातील बनगाव येथील शेतकरी शेतात कालव्याचे पाणी पोहोचत नसल्याने याची तक्रार करण्यासाठी ईटीयाडोह पाटबंधारे विभागाच्या शाखा व्यवस्थापकाकडे गेले असता; त्यांनी उपाययोजना सूचविण्याऐवजी शेतात पाणी पोहोचत नसेल तर शेती कशाला करता? असा अजब-गजब सल्ला दिल्याने शेतकरी बांधव नाराज होऊन संताप व्यक्त करीत आहेत.

शेतकरी बांधव खरीप हंगामासह रब्बी हंगामात सुद्धा शेतीची मशागत करीत असतात.यंदा ४५ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली.मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्येसुद्धा पुरेसा पाणीसाठा आहे.त्यामुळे अनेक शेतकयांनी रब्बी विभागाच्या कालव्याद्वारे पाणी दिले जाते.पण काही शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळत नसल्याने त्यांचा रब्बी हंगाम संकटात आला आहे.बनगाव येथील शेतकरी सुखराम थेर यांच्या शेतात कालव्याचे पाणी पोहोचत नाही त्यामुळे या संदर्भात त्यांनी संबंधित ईटीयाडोह व्यवस्थापन अधिकाऱ्यांना तक्रार केली.

त्यानंतर शाखा अभियंता आणि कालवा निरीक्षक यांनी थेर यांच्या शेतीला भेट दिली.शेतात पाणी जाण्यासाठी जवळ मोंगाड पायली बसविण्याची परवानगी द्यावी किंवा पंप बसवून शेतीची लागवड करण्याची मुभा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. परंतु अधिकाऱ्यांनी त्यासाठी मनाई केली व उलट शेतकऱ्याला शेती कशाला करता? असा अफलातून सल्ला दिल्याचे शेतकरी सुखराम थेर यांनी सांगितले.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून सदर प्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे थेर यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!