Saturday, September 12, 2026
Homeदेसाईगंजशेकडो हेक्टर वरील पिकांचे नुकसान करून ओसरला पाणी....-कोंढाळा गावातील शेतकरी चिंताग्रस्त…

शेकडो हेक्टर वरील पिकांचे नुकसान करून ओसरला पाणी….-कोंढाळा गावातील शेतकरी चिंताग्रस्त…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- यंदाच्या परिस्थितीत शेतकरी बांधव शेतातील धान पिकांच्या बाबतीत मोठ्या आशेवर होते.धान पीक पाहून अमुक व्यक्तीला एवढे धान होणार; तमुक व्यक्तीला तेवढे धान होणार; मात्र कृत्रिमरीत्या आलेल्या पुराने शेतकरी बांधवांच्या सर्व आशेवर पाणी फेरले आहे.कारण की साहेब वा मॅडम येतो व वर-वर पाहून निघून जातो.त्यांना ‘ना सुतक ना बारसा ‘असे असल्याने कोंढाळा गावातील शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.

गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने धरण सुरक्षेच्या दृष्टीने व धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता धरणातून आवश्यकतेनुसार टप्प्या-टप्प्याने १५ सप्टेंबर व १६ सप्टेंबर २०२३ रोजी धरणाचे पाणी सोडण्यात आले होते.त्यानुसार विविध नदी नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढली व अनेक रस्ते बंद झाली होती. अशातच देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावापासून तीन किलोमटरवर अंतरावर पश्चिमेस असलेल्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने गावातील शेतकरी बांधवांची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी बांधवांवर मोठे संकट ओढवले होते.

कोंढाळा गावातील शेतकरी बांधवांच्या जवळपास शेकडो हेक्टर शेती पुरबाधित झाल्याने उभे असलेले शेतातील संपूर्ण धानपिक जरी नष्ट झाले नसले तरी गर्भाशयात आलेल्या धान पिकावर पुराच्या पाण्याचा मारा झाल्याने येणारे धानाचे लोंब काळपट व पांढरे येणार असल्याचे गावातील शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे.त्यानुसार येणाऱ्या धानाला कवडीमोल भाव मिळणार असल्याने शेतीचे पंचनामे होणार की नाही? तसेच नुकसान भरपाई मिळणार की नाही? अशी चिंता गावातील शेतकरी बांधवांना भेडसावत आहे. अशातच ‘शेकडो हेक्टर वरील पिकांचे नुकसान करून ओसरला पाणी’ व साहेब म्हणतो आम्ही आता गाणार गाणी’ असे होऊन चालणार नाही तर नुकसाभरपाई देण्यात यावी; अशी मागणी शेतकरी बांधवांकडून जोर धरू लागली आहे.

.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!