- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-नागरिकांना आरटीओ ई-चालान बाबत नेहमी सतर्कता बाळगा म्हणून आवाहन करण्यात येत असते, मात्र काहीजणांना याबाबत अजूनही कल्पना नसल्याने मोठा आर्थिक फटका बसतांना दिसून येतो.अश्याच प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती शहरात नुकताच ‘आरटीओ ई-चालान’ चा ३४ वर्षीय तरुण बळी पडल्याची घटना उघडकीस आली आहे.व्हॉट्सॲपवर आलेल्या आरटीओ ई-चालानच्या एपिके फाईलवर क्लिक करताच क्षणातच मोबाईल हॅक झाला आणि मोबाईलचा संपूर्ण ताबा ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या चोरट्याकडे जाऊन बँकेच्या खात्यातील तब्बल १ लाख ९४ हजार ७०० रुपये लंपास झाल्याची घटना काल शुक्रवारी उघडकीस आली.इम्रान खान वय ३४ वर्षे, रा.इंदिरानगर,भद्रावती,जि.चंद्रपूर यांच्या बाबतीत सदरचा प्रकार घडलेला असून त्यांनी चंद्रपूरच्या सायबर सेलकडे अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
भद्रावती येथील इम्रान खान यांना बुधवारी त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर ‘आरटीओ ई-चालान’ नामक ‘एपिके’ फाईलचा मॅसेज आला.त्यांना वाटले की आपल्यावर कुठले तरी चालान आले असावे, त्यामुळे खान यांनी त्या फाईलवर क्लिक केले.फाईलवर क्लिक करताच क्षणातच मोबाईल हॅक झाला आणि मोबाईलचा संपूर्ण ताबा हा चोरट्याकडे हस्तांतरित झाला.लागलीच सायबर चोरट्यांनी त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून पहिल्यांदा १ लाख ९० हजार रुपये व नंतर ४ हजार ७०० रुपये,अशी एकूण १ लाख ९४ हजार ७०० रुपयांची रक्कम काढून बँक ऑफ बडोदाच्या खात्यात वर्ग केली.मोबाईलवर रक्कम काढल्याचे मॅसेज दिसताच खान यांच्या लक्षात आले.या प्रकरणी त्यांनी सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे.
- Advertisement -

