Monday, August 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तएकदा आंदोलन छेडले तर पुन्हा माघार घेणार नाही; मनोज जरांगे पाटीलांची आंदोलनाची...

एकदा आंदोलन छेडले तर पुन्हा माघार घेणार नाही; मनोज जरांगे पाटीलांची आंदोलनाची घोषणा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.आज, शनिवार १६ मे रोजी मराठा समन्वयक समितीची बैठक पार पडली.या बैठकीनंतर जरांगे पाटील यांनी आंदोलनाची तारीख जाहीर केली आहे.येत्या,शनिवार ३० मे २०२६ रोजी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या त्यांच्या गावी ते उपोषणाला बसणार आहेत.३० मे पासून आपण आमरण उपोषण करणार आहे.तसेच राज्यभरात शांततेत आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.यामुळे आता सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.आंदोलन सुरू व्हायच्या आधी सरकारने आंदोलनाबाबत योग्य ती कार्यवाही करावी.एकदा आंदोलन छेडले तर पुन्हा माघार घेणार नाही आणि आपण कुणाचेही ऐकणार नाही,अशी थेट भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. सरकारने ३० तारखेच्या आत मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात.३० तारखेनंतर सरकारसाठी वेळ वाढवून देणार नाही. सातारा,पुणे आणि कोल्हापूर संस्थानाचं गॅझेट सरकारने लागू करावे.तसेच मराठा आंदोलकांविरोधात दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत.सरकारने मराठा आरक्षणाबाबतची उपसमिती बरखास्त करावी,आरक्षणासाठी नवीन समिती स्थापन करा,हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचे वाटप थांबले आहे.ते पुन्हा सुरू करा. ११९४ च्या धर्तीवरच आम्हाला जीआर हवा आहे. अन्यथा सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही,अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!