Monday, January 19, 2026
Homeचंद्रपूरविषारी सापावर पाय पडताच केला दंश; सुरक्षारक्षकाचा मृत्यू..

विषारी सापावर पाय पडताच केला दंश; सुरक्षारक्षकाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-महावितरण कंपनीच्या उपकेंद्रात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या एका ४० वर्षीय इसमाचा विषारी सापाने दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील वेजगाव शेत शिवारात घडली.भीमराव वसंता पेंदोर,रा.वेजगाव, ता.गोंडपिपरी असे मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
भीमराव पेंदोर हे विरुर येथील महावितरण कंपनीच्या कर्तव्यावरून घरी परतले होते.त्यानंतर ते शेतात गेले.
शेतातील पीक पाहणी करत असतांनाच गवतात दडून असलेल्या विषारी सापावर त्यांचा पाय पडला.पाय पडताच सापाने दंश केला.लागलीच भीमराव यांना तोहोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.उपचार सुरू असतांनाच प्रकृती जास्तच खालावल्याने भीमराव यांचा काल बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.मृतक भीमराव हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी व आई-वडील असून कुटुंबात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामासाठी घराबाहेर पडलेल्या इसमाचा संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह.. – डोक्यावर व शरीरावर गंभीर जखमा; तर हाताचे बोट छाटलेले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एक दिवसापूर्वी कामासाठी घराबाहेर पडलेल्या इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना अहेरी तालुक्याच्या आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरील...

पुढील वित्तीय वर्षासाठी ३७१ कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील सर्व विभागांनी केवळ लोकसंख्येच्या आधारावर नव्हे,तर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार,दुर्गमता,दळणवळणाची परिस्थिती आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन पुढील पाच वर्षांचा समन्वित मास्टर...

उद्याला राज्याचे मुख्य सचिव गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे उद्या,मंगळवार २० व २१ जानेवारी २०२६ रोजी दोन दिवसांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात...

तक्रारदार केवळ मागासवर्गीय आहे म्हणून गुन्हा सिद्ध होत नाही.. -अपमान करण्यामागे त्या व्यक्तीला जातीवरून नीचा दाखवण्याचा हेतू असणे अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-काहीजण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती(अत्याचार प्रतिबंधक)कायद्याचा धाक दाखवून अनेकांना कायद्याच्या कचाट्यात गोवण्याचा प्रयत्न करीत असतात.पण,कायदा हा सर्वांसाठी समान आहे.नाहक ठोस पुराव्याअभावी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!