Saturday, June 20, 2026
Homeचंद्रपूरवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; एक किमी अंतरावर नेले फरफटत...

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; एक किमी अंतरावर नेले फरफटत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या काही भागातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाघांचा मुक्तसंचार वाढलेला दिसून येतो.जंगलातील वन्य प्राणी संपुष्टात येऊ लागले की, भुकेने व्याकूळ झालेल्या वाघांचा हल्ला मनुष्यावर होऊ लागला आहे.अशातच जनावरे चारण्यासाठी शेतावर गेलेल्या शेतकऱ्याला वाघाने जंगलात फरफटत नेत ठार केले असल्याची घटना काल,२६ ऑगस्टला दुपारी २  वाजताच्या सुमारास सावली तालुक्याच्या वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या व्याहाड (खुर्द)उपवन परिक्षेत्रातील उपरी वन बिटातील डोनाळा जंगल परिसरात घडली.आनंद वासेकर वय ५० वर्षे रा.डोनाळा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नेहमीप्रमाणे शेतकरी आनंद वासेकर हे गावातीलच चिंदुजी नैताम व किशोर सोनटक्के यांच्यासोबत गुरे चराईसाठी गेले.गुरे चारत असताना वाघाने अचानक आनंद वासेकर यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना जंगलात फरफटत नेले.हे दृश्य बघून त्यांच्यासोबत असलेल्या दोन्ही व्यक्तींनी आरडाओरड करीत गावाकडे धाव घेतली आणि गावात या घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती गावात मिळताच गावकरी जंगलाच्या दिशेने धावून गेले.याची माहिती वनविभागाला व सावली पोलिसांना देण्यात आली. वनविभागाने त्या परिसरात शोध मोहीम सुरू केली. घटनास्थळापासून एक किमी अंतरावर आनंद वासेकर यांचा मृतदेह मिळाला.घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे,उपवन परिक्षेत्र अधिकारी सूर्यवंशी,बीट वनरक्षक सोनेकर,महादेव मुंडे,वनरक्षक आखाडे,मेश्राम व वनकर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!