Wednesday, August 5, 2026
Homeचंद्रपूरवाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात असल्याने पुढील काळात काही वस्त्यांमध्ये मानवाचे वास्तव्य कमी आणि वाघोबांचेच राज्य दिसून येणार की काय?असा प्रश्न निर्माण झालेला असतांनाच चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील जनकापूर जंगल परिसरालगतच्या शेतात वाघाने हल्ला चढवून एका शेतकऱ्याला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.सदरची घटना काल मंगळवारी घडली असून घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रमेश जयराम काशीवार वय ५५ वर्षे,असे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.शेतकरी रमेश काशीवार हे दुपारच्या सुमारास जंगल परिसरालगत असलेल्या शेतावर गेले होते. दरम्यान,जंगल परिसरातून आलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.शेतावर गेलेले रमेश काशीवार सायंकाळ होऊनही घरी परतल्याने नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.शोधादरम्यान ते शेतात मृतावस्थेत आढळून आले.यानंतर घटनेची माहिती तातडीने वन विभागाला देण्यात आली व पुढील प्रक्रिया पार पाडण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोठी-पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या नुकसानीची होणार उच्चस्तरीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी-रेगाडंडी-पिपलीबुर्गी मार्गावरील सा.क्र.६/९०० येथील मोठ्या पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर...

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!