- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावापासून पश्चिमेस तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंढा वैनगंगा नदी घाटातून कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळूचा उपसा करण्यात आला.अवैध वाळूचा उपसा सुरू असतांना याबाबत गावातील सुजाण नागरिक तथा ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी पत्रव्यवहार करून देसाईगंज महसूल प्रशासनास माहिती देण्यात आली.मात्र,माहिती देऊनही देसाईगंज महसूल विभागाकडून कुठल्याही प्रकारची दखल वा कार्यवाही करण्यात आली नसल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला.कोंढाळा-मेंढा रेतीघाटामध्ये जवळपास २ किलोमिटर वर्तुळाकार अंतर जमिनीपासून ५ फुटाच्यावर हजारो ब्रास वाळूचे अवैधरित्या उत्खनन करण्यात आले आहे.देसाईगंज महसूल प्रशासनास वेळोवेळी पत्रव्यवहार करुनही तसेच दखल घेत नसल्याप्रकरणी दिनांक-३० डिसेंबर २०२४ पासून गावातील नामदेव वसाके व सत्यवान रामटेके यांनी देसाईगंज तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.त्यानुसार सदर आंदोलनास ४५ दिवसांचा कालावधी लोटलेला आहे.या कालावधीत तीन मागण्यांपैकी दोन मागण्या पूर्ण करून एक मागणी प्रलंबित असल्याने ४५ दिवसानंतरही आंदोलनकर्ते बेमुदत ठिय्या आंदोलनावर ठाम आहेत.अशातच आंदोलनकर्त्यांनी
वर्ष लोटून गेला तरी चालेल,पण मागणी मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही; अशी ठोस भूमिका घेतली आहे.
आंदोलन सार्वजनिक हिताचा👇
महत्वाचे म्हणजे,पुकारण्यात आलेला आंदोलन हा वैयक्तिक स्वरूपाचा नसून सार्वजनिक हिताचा आहे.त्यामुळे क्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांनी मुद्दा उचलून धरणे आवश्यक आहे.मात्र,या ठिकाणी वेगळीच परिस्थिती पहावयास मिळून येत आहे.
चर्चेतील विषय👇
चर्चेतील विषयामध्ये,अनेकांचे खिसे गरम झाल्याने अनेकजण चुप्पी साधून ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका बजावू लागले असल्याची खमंग चर्चा सर्वत्र सुरू आहे.कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळू उपसा करण्यासाठी वाळू चोरट्यांना केवळ कोंढाळा गावातील परिसरच दिसून येतो काय? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
- Advertisement -

