Thursday, January 22, 2026
Homeदेसाईगंज लाखो रुपयांचा उसेगांव बिटातील मनोरा जंग खात..- वन विभाग देसाईगंज (वडसा)चे दुर्लक्ष

 लाखो रुपयांचा उसेगांव बिटातील मनोरा जंग खात..- वन विभाग देसाईगंज (वडसा)चे दुर्लक्ष

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- तालुक्यातील उसेगांव बिटातील जंगल परिसरात अंदाजे जवळपास ५० फूट उंच मनोरा वित्तीय वर्ष २०२२-२३ मध्ये वन विभाग वडसा यांच्या मार्फतीने बांधकाम करण्यात आला.बांधकाम करून त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले.मात्र लाखो रुपये खर्चूनही लोखंडी मनोऱ्या ला साधा पेंटही मारल्या गेला नसल्याने मनोरा जंग खात आहे.सदर मनोरा जंग खात असूनही वन विभाग देसाईगंज (वडसा) चे अक्षम्य दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.

मागील वर्षी देसाईगंज तालुक्यात नरभक्षक वाघ,वाघीण व इतर हिंस्त्र प्राण्यांनी धुमाकूळ घालत होता.तालुक्यातील कोंढाळा, उसेगांव,डोंगरगांव,कासवी व इतर जंगल परिसरात वन्य प्राण्यांचे वावर वाढले होते.अशातच काही ठिकाणी जंगल परिसरात लाकडी मचान तयार करून वन्य प्राण्यांवर पाळत ठेवणे,जंगल परिसरात आग लागल्यास पटकन लक्षात यावे,वन तस्करीवर आळा घालण्यासाठी व इतर कामासाठी लाकडी मचान बांधकाम उपयोगात आणले जात होते.सदर लाकडी मचान कधीकाळी ऊन,पाऊस,वादळ,वारा व इतर कारणांमुळे तग धरेल किंवा नाही व सदर मचान कमी उंचीचे असल्याने जास्त दूर वरचे दृश्य दिसेनासे होऊन एखादेवेळी हिंस्त्र प्राणी मचानावर चढून वन कर्मचारी वा वन मजुरांवर हल्ला चढविण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याची बाब लक्षात घेता वित्तीय वर्ष २०२२-२३ मध्ये देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा वरून पूर्वेस दोन किलोमीटरवर अंतरावरील उसेगांव बिट जंगल परिसरातील उसेगांव कडे जाणाऱ्या मुख्य मार्गालगतच्या बाजूस लोखंडी अंदाजे जवळपास ५० फूट उंच मनोरा तयार करण्यात आला आहे.लोखंडी उंच मनोऱ्यामुळे दूरवरचे दृश्यही न्याहाळता येणार आहे.त्याच बरोबर जंगल परिसरात लागलेली आग,वन तस्करी,वन्य प्राणी व इतर यांच्यावर पाळत ठेवता यावे; यासाठी लोखंडी मनोरा तयार करण्यात आला आहे.मनोरा तर तयार करण्यात आला.मात्र सदर लोखंडी मनोऱ्याला साधी पेंट ही केली गेली नसल्याने मनोऱ्यावर चढतांना संपूर्ण हात जंगामुळे भरून,पांढरे शुभ्र कपडे घालून मनोऱ्यावर चढल्यास अंगावरील कपड्यांचीही वाट लागते.अशातच पेंट नसल्याने पावसात हळूहळू जंग चढून लोखंडाचे आयुष्य कमी होऊन,लाखो रुपयांच्या लोखंडी मनोऱ्यावरील केला गेलेला खर्च पाण्यात वाया गेल्याशिवाय राहणार नाही.त्याच बरोबर लाखो रुपयांच्या मनोरा बांधकाम  अंदाज पत्रकात साधी पेंट ही करण्याची तरतूद करण्यात आली नसावी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.अंदाज पत्रकात तरतूद असेल तर मग त्याला पेंट कां करण्यात आली नाही? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.यांस सर्वस्वी जबाबदार कोण?

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील आरोपी अटकेत.. – आरोपीस सात दिवसाची पोलीस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नागमंदिराजवळील जंगल परिसरात सोमवार १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आलेल्या आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील...

अधिकचे आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा खेळखंडोबा..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के पेक्षा अधिकचे ओबीसी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा खेळखंडोबा झाल्याचे...

थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन वनरक्षकाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन एका ३० वर्षीय वनरक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार २१ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील मुरमाडी गावातील...

पिकअप वाहनाचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार तर १३ जखमी.. – आज सकाळच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील नांदगाव येथे आज,बुधवार २१ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडून अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला,तर १२ जणांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!