Monday, July 13, 2026
Homeदेसाईगंजरात्रीचा अंधार अन् अवैध रेती उपस्याची दंडार....- जुनी वडसा,आमगांव वैनगंगा नदी पात्रातून...

रात्रीचा अंधार अन् अवैध रेती उपस्याची दंडार….- जुनी वडसा,आमगांव वैनगंगा नदी पात्रातून अवैध रेतीची तस्करी…- तस्करांनी गावातील नागरिकांची उडवली झोप…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- तालुक्यातील जुनी वडसा,आमगांव वैनगंगा नदी पात्रातून रेती तस्कर रात्रीच्या अंधारचा व शासकीय सुट्ट्यांचा फायदा घेत ढेक-ढेक ट्रॅक्टरचा आवाज करीत सुसाट वेगाने गावातील मुख्य रस्त्यावरील व इतर चोरट्या मार्गाने वाहने पळवित गावातील नागरिकांची झोप उडवीली आहे.अशातच ‘रात्रीचा अंधार अन् अवैध रेती उपस्याची दंडार’ आणखी किती दिवस सुरू राहणार आहे.यांवर आवर घालणार कोण?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्याच्या घडीला सगळीकडेच अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे.शासन स्तरावरून अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कितीही कठोर पावले उचलली जात असली तरीही रेती चोरटे याला न जुमानता आपलीच मनमानी करून झटपट श्रीमंतीच्या नादात अवैध रेती चोरी करण्याकडे वळलेली दिसून येत आहे.अशातच देसाईगंज तालुक्यातील जुनी वडसा,आमगांव वैनगंगा नदी पात्रातून अवैध रेतीचा उपसा रात्री १२ ते १ वाजे पासून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.शासकीय कार्यालयांना तीन दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्यांचा फायदा रेती चोरटे घेत असल्याचे दिसून येत आहे. सुट्ट्यांमुळे रेती तस्करांना सुगीचे दिवस आले असल्याचे कळते.काही शासकीय कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याने याचाच फायदा रेती तस्कर घेतांना दिसून येत आहेत.

हल्ली रेतीचा तुटवडा अनेकांना जाणवत असल्याने रेतीचे भाव गगनाला भिडले आहेत.रेती चोरट्यांची यामुळे चांदीच-चांदी पहावयास मिळते आहे.अंतर ठरवून रेतीचे दर ठरविले जात आहेत.एक ब्रास रेतीसाठी ३ हजार ते ५ हजार रुपये सर्वसामान्य नागरिकांना मोजावे लागत आहे.यामुळे रेती तस्करांची चांदी तर सर्वसामान्य नागरिकांची वांदी झाली आहे. शासनाच्या उदासीन धोणामुळे अनेक रेती घाटांची लिलाव प्रक्रिया रखडली गेली आहे.त्यामुळेच अवैध रेती तस्करी फोफावली असल्याचे सगळीकडेच चित्र निर्माण झाले आहे.मात्र यामधे सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी केली जाते आहे.’रात्रीचा अंधार अन् अवैध रेती उपस्याची दंडार’ कधी बंद होणार व अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर आळा घातला जाणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!