Monday, September 7, 2026
Homeचंद्रपूरमुसळधार पावसाने पुल तुटला; अनुचित प्रकार टळला..!

मुसळधार पावसाने पुल तुटला; अनुचित प्रकार टळला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावत संपूर्ण जिल्हा जलमय करून सोडला आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.अश्यातच चंद्रपूर शहराला लागून असलेल्या झरपट नदीवरील पुल मुसळधार पावसाने तुटून वाहू लागल्याने पठाणपुरा आणि भिवापूर या दोन महत्त्वाच्या वार्डातील नागरिकांचा थेट संपर्क तुटला आहे.मात्र,पुल तुटत असतांना सदरच्या मार्गावरून रहदारी सुरू नसल्याने एखादा अनुचित प्रकार टळला. सदरचा पुल केवळ वाहतुकीसाठीच नाही,तर चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली यांच्या यात्रेदरम्यान भाविकांसाठीही अत्यंत महत्त्वाचा असून या मार्गावरून मोठ्या संख्येने वाहतूक वळवली जाते,त्यामुळे या पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना केले आहे. त्यासंदर्भात तसे पत्रही दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणावर महागाईचे सावट..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर...

मॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक...

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!