Wednesday, June 10, 2026
Homeदेसाईगंजमुख्य मार्गावरील हायमास्ट लाईट करतात लीपलाप- देसाईगंज नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

मुख्य मार्गावरील हायमास्ट लाईट करतात लीपलाप- देसाईगंज नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- नगरपरिषद देसाईगंजतर्फे आरमोरी मार्गे नायरा पेट्रोल पंपा पासून ते कुरुड बसस्थानका पर्यंतची रस्त्यालगत लावलेली हायमास्ट लाईट गेली अनेक दिवांपासून काही बंद स्थितीत तर काही लाईटे रात्रोच्या सुमारास लीपलाप करीत असूनही देसाईगंज नगरपरिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागतो आहे.

देसाईगंज ते आरमोरी मार्गे रात्रोच्या सुमारास सुसाट वाहने रस्त्यावरून धावली जातात.जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ देसाईगंज असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिक कामासाठी तालुका मुख्यालयी जात असतात.दिवसभर काम करून सायकलस्वार, दुचाकीस्वार व इतर सायंकाळी व रात्रोच्या सुमारास गावाकडे परत जात असतांना काही वाहन धारक वाहनाचे अप्पर-डीप्पर देत नसल्याने समोरील वाहनाच्या लाईटचा प्रकाश डोळ्यांवर येत असल्याने येणारे समोरील वाहन कोणते व मुख्य रस्त्यावरून वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.रात्रीच्या वेळेस सगळीकडे अंधारामुळे ये-जा करणाऱ्या नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.अशातच रस्त्याच्या कडेला असलेले काही हायमास्ट लाईट बंद तर काही लीपलाप करीत असल्याने देसाईगंज नगरपरिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता सदर मार्गावरील हायमास्ट लाईट दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!