Friday, April 10, 2026
Homeदेसाईगंजमाहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास केली जाते टाळाटाळ

माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास केली जाते टाळाटाळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :-माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत मागितल्या जाणाऱ्या विविध शासकीय कार्यालयातील जनमाहिती अधिकारी मागितलेली माहिती देण्यास ३० दिवसांचा कालावधी लोटूनही माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.विहित मुदतीत माहिती दिली जात नसल्याने भ्रष्टाचाराला चालना मिळत असल्याचे चित्र हल्ली सर्वत्र दिसून येत आहे.

माहितीचा अधिकार कायदा १२ आक्टोंबर २००५ रोजी अंमलात आणला गेला. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत प्रशासनातील दोष,उणिवा,गैर प्रकार उघड करण्यास मदत होते. माहितीचा अधिकार एकमेव असा कायदा आहे कि लोकप्रशासनाने पाळायचा असून त्यावर जनतेची नजर असते.कायद्यामुळे संपूर्ण भ्रट्टाचार संपणार नसून भ्रष्टाचाराचे काही प्रमाण कमी होणार आहे.कायद्यामुळे शासनाचा जनतेशी संबंध येतो.शासकीय तसेच खासगी कार्यालयाच्या कामकाजात पारदर्शकता यावी व सामान्य नागरिकांना कामकाजाची माहिती व्हावी व अधिकृत कागदपत्रे मिळाविता याच उद्देषाने माहितीचा अधिकार कायदा पारित करण्यात आला.मात्र सध्या स्थितीत जनमाहिती अधिकारी ३० दिवस होऊन सुद्धा माहिती देत नसल्याचे निदर्शनास येत आहे.एवढा कालावधी मिळूनही माहिती दिली जात नसल्याने भ्रष्टाचार कमी न होता वाढीस लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.शासन स्तरावरून कितीही कठोर कायदे तयार केली तरी काही भ्रष्ट अधिकारी,कर्मचाऱ्यांना याचे सुतक ना बारसा असे झाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर “जयंती महोत्सव”.. – उद्याला सुप्रसिद्ध गायिका अंजली भारती यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे उद्या,शनिवार ११...

मोबाइलवर बोलण्याच्या नादात बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने कारने उडवले पती-पत्नीला..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाइलवर बोलण्याच्या नादात एका खासगी बँकेत शाखा व्यवस्थापक असलेल्या कार चालकाने दुचाकीने घरी परतणाऱ्या पती-पत्नीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती...

वेळ,पैसा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च वाचवायचा असेल तर लोकअदालतीचा घ्या लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रलंबित प्रकरणांच्या जलद व सामोपचाराने निपटाऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशान्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गडचिरोली यांच्या वतीने येत्या,...

आईच्या निधनानंतर वडिलाने लग्न करू नये म्हणून १९ वर्षीय मुलाने वडिलाची केली निर्घृण हत्या..

उद्रेक न्युज वृत्त :-नात्यांमधील वाढता दुरावा आणि संताप किती टोकाला जाऊ शकतो,याचे भीषण उदाहरण मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याच्या रुई गावात आज,गुरुवार ९ एप्रिल रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!