- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-परमेश्वराची किमयाच न्यारी.एकीकडे मानवाला पृथ्वी तलावावर काहीतरी चांगले कार्य करून ये..म्हणून पाठवतो.तर दुसरीकडे दुःखाचे डोंगर उभे करून सोडतो.आपण ज्याचा मनात कधीही विचारच केला नसेल,अशी एखादी घटना अचानकपणे घडत असते आणि सर्वत्र उभा येऊन ठाकतो,तो काळोख.अशीच काहीशी घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात नुकतीच उघडकीस आली आहे.घटनेत माऊली आपल्या १२ वर्षीय मुलाला कुणीतरी वाचवा हो..! अशी काळीज फाटल्यागत आर्त हाक देत राहिली अन् चिमुकला गटांगळ्या खात आईच्या डोळ्या देखत दिसेनासा झाला आणि नदी पात्रात बुडून मृत्यू झाला.सदरची घटना काल,बुधवारी सकाळच्या सुमारास घडली असून घटनेत समीर मोहन वरखडवार रा.खातगाव,ता.सिंदेवाही, जि.चंद्रपूर असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे.तो इयत्ता सहावीत शिकत होता.घटनेच्या दिवशी आई आणि मुलगा सिंदेवाही तालुक्याच्या खातगाव गावापासून काही अंतरावर असलेल्या उमा नदी पात्रावर गेले होते.मुलाची आई नदीवर कपडे धुत असतांना मुलगा जवळच पाण्यात खेळत होता.आई कपडे धुण्यात व्यस्त असतांनाच मुलगा खेळता-खेळता खोल पाण्यात गेला. खोल पाण्यात जाताच गटांगळ्या खाऊ लागला.मुलगा बुडत असल्याचे लक्षात येताच तिने आरडाओरड करून धाव घेतली.पण,तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि आईच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाला.घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवारसह पथक दाखल झाले.घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदकरिता सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठविले.घटनेने आईच्या मनावर मोठा आघात करून सोडला आहे.
- Advertisement -

