उद्रेक न्युज वृत्त :-मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर आज,रविवार २ नोव्हेंबरला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.अश्यातच ऐन अंतिम सामन्याच्या दिवशीच पावसाने एंट्री केल्याने पावसामुळे टॉसला उशीर झाला आहे. टॉस आज दुपारी अडीच वाजता होणार होता आणि सामना दुपारी ३ वाजता सुरू होणार होता.पण,पावसाने व्यत्यय आणल्याने अंतिम सामना नियोजित वेळेपेक्षा दोन तास वाढवता येतो.आज सामना न झाल्यास सदरचा सामना दुसऱ्या दिवसासाठी राखीव दिवस म्हणून असतो.सध्या मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या दोन सामन्यातही पावसामुळे व्यत्यय आले होते.विशेष म्हणजे,सामन्याचा निकाल लागण्यासाठी,दोन्ही संघांना किमान २० षटके फलंदाजी करण्याची संधी असणे आवश्यक आहे.जर नियोजित दिवशी हे शक्य नसेल,तर राखीव दिवशी खेळ मागील दिवसाच्या वेळेपासूनच पुन्हा सुरू होईल.राखीव दिवसानंतर कोणताही निकाल न लागल्यास,भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांना स्पर्धेचे संयुक्त विजेते घोषित केले जाईल.दोन्ही संघांनी कधीही ट्रॉफी जिंकलेली नाही.महिला एकदिवसीय विश्वचषकात तब्बल पंचवीस वर्षांनंतर एक नवीन विजेता असेल.शेवटचा नवीन विजेता सन २००० मध्ये होता,जेव्हा न्यूझीलंडने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवले होते.शिवाय,स्पर्धेच्या ५२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीचा भाग नाहीत.ऑस्ट्रेलिया सात वेळा आणि इंग्लंड चार वेळा विजेता ठरला आहे.भारतीय महिला संघ तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे,तर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच.दोन्ही संघ कोणत्याही स्वरूपात त्यांचे पहिले विश्वचषक जेतेपद पटकावण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पावसाची एंट्री..!
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

