- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज,६ डिसेंबरला देसाईगंजच्या नैनपूर येथील महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन केले.प्रसंगी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे विचार,कर्तृत्व व सामाजिक योगदान यांचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमाकांत कवासे यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक खेमराज नारायण तिघरे उपस्थित होते.कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक कृषी अधिकारी कल्पना ठाकरे उपस्थित होत्या.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” हा बाबासाहेबांचा विचार विद्यार्थ्यांसमोर मांडत शिक्षणाचे परिवर्तनशील सामर्थ्य स्पष्ट केले.कल्पना ठाकरे यांनी मृदा संवर्धनाचे महत्त्व सांगत बाबासाहेबांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाची आठवण करून दिली.तर उमाकांत कवासे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महापरिनिर्वाण कां म्हटले जाते याबाबतचे विचार विद्यार्थ्यांपुढे मांडले.कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी हृंचिका कांबळे हिने केले,तर आभार प्रदर्शन सक्षम कवासे यांनी व्यक्त केले.प्रसंगी शाळेचे शिक्षकवृंद ईश्वर गहाणे,मंगेश तुपट,त्रिशाली सुखदेवे, अपर्णा जाडे,प्रियंका तलमले व शिक्षिका प्राची यांची उपस्थिती लक्षणीय होती. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमाद्वारे बाबासाहेबांच्या कार्याचा जागर करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
- Advertisement -

