Wednesday, June 10, 2026
Homeदेसाईगंजमहात्मा गांधी नगर परिषद शाळेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली..

महात्मा गांधी नगर परिषद शाळेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज,६ डिसेंबरला देसाईगंजच्या नैनपूर येथील महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन केले.प्रसंगी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे विचार,कर्तृत्व व सामाजिक योगदान यांचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमाकांत कवासे यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक खेमराज नारायण तिघरे उपस्थित होते.कार्यक्रमास प्रमुख  मार्गदर्शक म्हणून सहाय्यक कृषी अधिकारी कल्पना ठाकरे उपस्थित होत्या.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” हा बाबासाहेबांचा विचार विद्यार्थ्यांसमोर मांडत शिक्षणाचे परिवर्तनशील सामर्थ्य स्पष्ट केले.कल्पना ठाकरे यांनी मृदा संवर्धनाचे महत्त्व सांगत बाबासाहेबांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाची आठवण करून दिली.तर उमाकांत कवासे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महापरिनिर्वाण कां म्हटले जाते याबाबतचे विचार विद्यार्थ्यांपुढे मांडले.कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी हृंचिका कांबळे हिने केले,तर आभार प्रदर्शन सक्षम कवासे यांनी व्यक्त केले.प्रसंगी शाळेचे शिक्षकवृंद ईश्वर गहाणे,मंगेश तुपट,त्रिशाली सुखदेवे, अपर्णा जाडे,प्रियंका तलमले व शिक्षिका प्राची यांची उपस्थिती लक्षणीय होती. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमाद्वारे बाबासाहेबांच्या कार्याचा जागर करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!