Monday, August 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबसमुळे लग्नाला उशीर; ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव.. - एसटी महामंडळाच्या दोन...

बसमुळे लग्नाला उशीर; ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव.. – एसटी महामंडळाच्या दोन अधिकाऱ्यांना ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आजही अनेकांना ग्राहक तक्रार निवारण आयोग वा मंच काय असते,हे माहीतच नाही. त्यामुळे अनेकांच्या बाबतीत घडलेले विविध प्रसंग नशिबाला दोष देण्यात निघून जातात.मात्र,काहीजण नशिबाला दोष न देता प्रत्यक्षात कृती करतांना दिसून येतात.अश्याच प्रकारे नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव येथील तरुणाने ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेत नांदगावचे आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रकास अद्दल घडवली आहे.प्रकरणी मंचाने एसटी महामंडळाच्या दोन्ही अधिकाऱ्यांना ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की,नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव येथील सतीश बिडवे यांच्या मुलाचा २३ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे विवाह होता.एसटी बसच्या प्रासंगिक करारासाठी १५ फेब्रुवारी रोजी रोखपाल कारकुनी यांच्याकडे २२ हजार रुपये जमा केले होते.आगार व्यवस्थापक व नियंत्रकाने बसचालकाला चुकीचा पत्ता दिल्याने बस पत्त्यावर न जाता नांदगावहून नस्तनपूरला गेल्याने उशिरा पोहोचली.बस आल्यानंतर ५० किलोमिटर अंतरावर ती बंद पडली.निवारा नसल्याने वऱ्हाडी मंडळीचे हाल झाले. तक्रारदाराने विभाग नियंत्रकाशी संपर्क साधला असता, ‘अर्ध्या तासात बस उपलब्ध करून देतो,’ असे सांगितले. मात्र,बस सुमारे अडीच तास उशिरा आली.यामुळे वऱ्हाडाचे हाल झाले.रस्त्यावर ताटकळत बसावे लागले. बस लग्नस्थळी तीन तास उशिरा पोहोचल्याने लग्नाला उशीर झाला.त्यामुळे वधू पक्षाकडील मंडळीही नाराज झाली.शारीरीक,मानसिक त्रास झाल्याने तक्रारदाराने ५ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी,यासाठी ग्राहक मंचात तक्रार केली होती. ‘बस मुद्दामहून बंद पडली नाही.दुसरी बस वेळेत आली’ असा युक्तिवाद एसटी महामंडळातर्फे करण्यात आला.ग्राहक न्याय मंचाच्या अध्यक्ष मंदाकिनी भोसले,सदस्य कविता चव्हाण यांनी तक्रारदार आणि एस.टी.महामंडळाचे म्हणणे ऐकून घेतले.बस बंद पडल्याने तक्रारदार आणि वऱ्हाडाला त्रास सहन करावा लागला.मात्र,बस प्रवास ठरल्याप्रमाणे पूर्ण झाला नसल्याचा निष्कर्ष देत एसटी महामंडळाच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश नाशिकच्या ग्राहक मंचाने दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!