- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आजही अनेकांना ग्राहक तक्रार निवारण आयोग वा मंच काय असते,हे माहीतच नाही. त्यामुळे अनेकांच्या बाबतीत घडलेले विविध प्रसंग नशिबाला दोष देण्यात निघून जातात.मात्र,काहीजण नशिबाला दोष न देता प्रत्यक्षात कृती करतांना दिसून येतात.अश्याच प्रकारे नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव येथील तरुणाने ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेत नांदगावचे आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रकास अद्दल घडवली आहे.प्रकरणी मंचाने एसटी महामंडळाच्या दोन्ही अधिकाऱ्यांना ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की,नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव येथील सतीश बिडवे यांच्या मुलाचा २३ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे विवाह होता.एसटी बसच्या प्रासंगिक करारासाठी १५ फेब्रुवारी रोजी रोखपाल कारकुनी यांच्याकडे २२ हजार रुपये जमा केले होते.आगार व्यवस्थापक व नियंत्रकाने बसचालकाला चुकीचा पत्ता दिल्याने बस पत्त्यावर न जाता नांदगावहून नस्तनपूरला गेल्याने उशिरा पोहोचली.बस आल्यानंतर ५० किलोमिटर अंतरावर ती बंद पडली.निवारा नसल्याने वऱ्हाडी मंडळीचे हाल झाले. तक्रारदाराने विभाग नियंत्रकाशी संपर्क साधला असता, ‘अर्ध्या तासात बस उपलब्ध करून देतो,’ असे सांगितले. मात्र,बस सुमारे अडीच तास उशिरा आली.यामुळे वऱ्हाडाचे हाल झाले.रस्त्यावर ताटकळत बसावे लागले. बस लग्नस्थळी तीन तास उशिरा पोहोचल्याने लग्नाला उशीर झाला.त्यामुळे वधू पक्षाकडील मंडळीही नाराज झाली.शारीरीक,मानसिक त्रास झाल्याने तक्रारदाराने ५ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी,यासाठी ग्राहक मंचात तक्रार केली होती. ‘बस मुद्दामहून बंद पडली नाही.दुसरी बस वेळेत आली’ असा युक्तिवाद एसटी महामंडळातर्फे करण्यात आला.ग्राहक न्याय मंचाच्या अध्यक्ष मंदाकिनी भोसले,सदस्य कविता चव्हाण यांनी तक्रारदार आणि एस.टी.महामंडळाचे म्हणणे ऐकून घेतले.बस बंद पडल्याने तक्रारदार आणि वऱ्हाडाला त्रास सहन करावा लागला.मात्र,बस प्रवास ठरल्याप्रमाणे पूर्ण झाला नसल्याचा निष्कर्ष देत एसटी महामंडळाच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश नाशिकच्या ग्राहक मंचाने दिले.
- Advertisement -

