Friday, May 1, 2026
Homeनागपूरकहाणीमध्ये ट्विस्ट; २५ वर्षीय प्रेयसीच निघाली प्रियकराची मारेकरी..

कहाणीमध्ये ट्विस्ट; २५ वर्षीय प्रेयसीच निघाली प्रियकराची मारेकरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :- गुरुवारच्या मध्यरात्री नागपूरच्या नंदनवन कॉलनीत किरायाने राहणारा २४ वर्षीय तरुण त्याच्या खोलीत मृत आढळला होता,तर तीथेच २५ वर्षीय प्रेयसी रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली होती.प्रियकराने चाकूने हल्ला करीत मला जखमी केले व नंतर स्वतः वर वार करत आत्महत्या केली,असा दावा प्रेयसीने केला होता.मात्र,तरुणाच्या शरीरावरील खोल जखमा पाहून हत्येचा प्रकार तर नाही ना,असा संशय पोलिसांना होता. पोलिसांकडून गुरुवार ४ डिसेंबरच्या रात्री उशिरापर्यंत प्रेयसी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.प्रेयसी बीएएमएसचे शिक्षण घेत असून,प्रियकर पोलिस भरतीची तयारी करीत होता.घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.बालाजी कल्याणे वय २४ वर्षे,रा.मुदखेड,जि.नांदेड असे मृताचे नाव आहे.तर रती साहेबराव देशमुख वय २५ वर्षे,रा.करंजी,जि.नांदेड असे प्रेयसीचे नाव आहे.दोघेही नांदेडमधीलच रहिवासी आहेत.रती ही बीएएमएसची विद्यार्थिनी असून,ती इंटर्नशिप करीत आहे.तर बालाजी पोलिस भरतीची तयारी करीत होता.दोघांमध्येही चार वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते.बालाजी त्याच्या एका मित्रासोबत नंदनवन कॉलनीत किरायाने राहत होता.रतीदेखील जवळच राहत होती.बुधवारच्या रात्री ती बालाजीकडे गेली.रात्री एक वाजेपर्यंत बालाजी,रती व बालाजीचा मित्र या तिघांनीही गप्पा मारल्या.त्यानंतर मित्र दुसऱ्या खोलीत झोपायला गेला.रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास बालाजीच्या खोलीतून ओरडण्याचा आवाज आला.मित्राने आवाज दिला असता रतीने काही मिनिटांनी दरवाजा उघडला. बालाजी रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडला होता व रतीचा हात तसेच शरीरावरदेखील जखमा होत्या.मित्राने लगेच घरमालकाला सांगितले.त्यांच्या मदतीने दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले.पण,डॉक्टरांनी बालाजीला मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि रतीची चौकशी केली. बालाजीने तिच्यावर हल्ला केला आणि नंतर स्वतःवरही हल्ला केला,असे तिने सांगितले.मात्र,पोलिसांना तिच्यावर संशय आल्याने तिची कसून चौकशी केली असता कहाणीमध्ये ट्विस्ट आला.पोलिसांच्या तपासात २५ वर्षीय प्रेयसीनेच प्रियकराची हत्या केल्याची बाब स्पष्ट झाली आहे.पोलिसांनी अखेर बालाजीचा भाऊ शिवाजी ऊर्फ ऋषीकेश विनायकराव कल्याणे याच्या तक्रारीवरून रतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
२४ वर्षीय बालाजी कल्याणे व २५ वर्षीय रती  देशमुख या दोघांमध्येही चार वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते.रती अनेकदा त्याच्या खोलीवर जायची. बुधवारी रात्री ती बालाजीकडे गेली.त्यांचा लग्न करण्याचा मानस होता. मात्र,रतीच्या कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता.त्यामुळे बालाजी अगोदरच तणावात होता.बालाजीने हत्येच्या एक दिवस आधी  जर लग्न झाले नाही तर माझ्या मरणासाठीच तुम्हाला नागपूरला यावे लागेल,असे त्याने रतीच्या वडिलांना म्हटले होते.अश्यातच लग्नाच्या मुद्द्यावरूनच गुरुवारी रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांचा वाद झाला आणि रतीने घरातील चाकू उचलून बालाजीच्या अंगावर पूर्ण ताकदीनिशी वार केले.त्यात तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला.त्याला त्या अवस्थेत पाहून ती घाबरली व तिनेदेखील स्वतःवर वार करून घेतले.सुरुवातीला तिने बालाजीनेच तिच्यावर हल्ला केला व नंतर स्वतःला मारून घेतल्याची बतावणी केली.मात्र,बालाजीच्या अंगावर खोलवर घाव होते व त्यातून पोलिसांचा संशय बळावला.तिची चौकशी केली असता सदरचा प्रकार समोर आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!