- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-ब्रम्हपुरी तालुक्याच्या आवळगाव येथील ३० वर्षीय तरुणाचा त्यांच्या
दुचाकीला टिप्परने मागून जबर धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला,तर सोबत असलेले दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना काल,सोमवार २७ ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान आरमोरी शहराच्या बर्डी टी-पॉइंट जवळील आरमोरी-गडचिरोली मार्गावर घडली.अपघातात सारंग रवींद्र शेंडे वय ३० वर्षे, रा.आवळगाव,ता.ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर महेंद्र सुखराम जांगधुर्वे वय ३२ वर्षे व डेव्हिड नवलू मडावी वय ३५ वर्षे हे दोघेही गंभीर जखमी झाले असून ते गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील येरकड गावातील रहिवासी आहेत.अपघात घडताच नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व आरमोरी पोलिसांना माहिती दिली.अपघातातील डेव्हीड मडावीची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेच्या दिवशी तिघेही त्यांच्या एमएच ३३ एजे २७३५ क्रमांकाच्या दुचाकीने आरमोरी शहरातील विवाह सोहळा आटोपून काही कामानिमित्त सारंग शेंडेच्या गावाकडे जाऊन परत आरमोरीकडे येत असतांना शहराच्या बर्डी टी-पॉइंट जवळील आरमोरी-गडचिरोली मार्गावर एमएच ४० सीटी ११५५ क्रमांकाच्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.दुचाकीला धडक बसताच तिघेही दुचाकीवरून मुख्य मार्गावर दूरवर फेकल्या गेले. यात सारंगच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटना घडताच टिप्पर चालक वाहनासह फरार झाला.प्रकरणी आरमोरी पोलिसांनी फरार चालकावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
- Advertisement -

