- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांना गुरू मानले होते. महात्मा फुले यांच्या समतावादी विचाराने डॉ.आंबेडकर प्रभावित झाले होते.त्यास अनुसरून बाबासाहेबांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. जातीयता,अस्पृश्यता, भेदाभेद,असमानता,अशिक्षितपणा हे देशाचे खरे शत्रू आहेत.यावर मात करूनच देशाला शक्तीशाली गणराज्य बनविता येवू शकते.असे अलौकिक विचार या गुरू-शिष्यांच्या जोडीने देशाला दिलेत.ते फक्त विचार ठेवूनच थांबले नाहीत तर तशी कृती देखील केली.त्यामुळेच आपला देश आज एका वेगळ्या वळणावर आलेला असला तरी धर्म,जात,पंथ, सांप्रदायिकता,उच्च निचता कमी होण्याचे नावच घेत नाही आहे.अशातून देशाला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर महापुरुषांनी दिलेले विचार महत्त्वपुर्ण आहेत.यात म.फुले व डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.डाॅ.प्रकाश राठोड यांनी केले.काल,शुक्रवारी १८ एप्रिल रोजी देसाईगंज येथील फव्वारा चौकात राष्ट्रनिर्माते विचारमंचाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंतीत्सोव साजरा करण्यात आला.यातील वैचारिक प्रबोधनाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.दरम्यान प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक प्रा.डाॅ.सर्जनादित्य मनोहर नागपूर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.छायाताई खोब्रागडे व प्रा.शालीनी शहारे मंचावर उपस्थित होत्या.फुले दाम्पत्य जन्माला आले नसते तर कदाचित पुरूषी अहंकाराच्या दास्यत्वातून महिला स्वतंत्र झाली नसती.आज आमच्या सारख्या महिलांनी जी काही भरारी घेतली ती फुले दांपत्याची देण आहे.अशा शब्दांत छाया खोब्रागडे यांनी आपल्या व्याखानाची मांडणी करून अन्य विषयांवर देखील भाष्य केले. सर्जनादित्य खोब्रागडे यांनी जातीच्या समस्या व आरक्षणावरील जातीय उप-वर्गीकरण करणे हा एका कटाचा भाग असल्याचे आपल्या व्याख्यानात नमूद केले.प्रारंभी आंबेडकरी जलसाकार आकाश अंबादे व त्यांच्या कला संचाच्या माध्यमातून जल्लोष भिम-ज्योतीबाचा हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर प्रसिद्ध साहित्यिकांच्या माध्यमातून वैचारिक प्रबोधन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओबिसी चळवळीचे प्रबोधनकार प्राचार्य दामोधर शिंगाडे यांनी केले.संचालन गझलकार रमेश बुरबरे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.अनिल होळी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओबिसी,एस.सी., एस.टी.अल्पसंख्याक आणि अठरापगड जातीतील कार्यकर्ते एकत्र आले होते.यातून राष्ट्रनिर्माते विचारमंच तयार झाला.या माध्यमातून सदर कार्यक्रम यशस्वी झाला हे विशेष.
- Advertisement -

